Tuesday, September 28, 2010

कृष्ण किनारा....अरुणा ढेरे

नुकतेच दूर्गाबाई भागवतांचे "व्यासपर्व" वाचनात आल्यानंतर अरुणा ढेरेंचे "कृष्ण किनारा" वाचायला मिळाले. आणि परत महाभारताशी संबंधीत स्त्री पात्रांशी संवांद साधला गेला. कृष्ण किनारा या पुस्तकात ३ स्त्री पात्रांबाद्दल अरुणा ढेरेंनी लिहिले आहे.
त्या तिघी : राधा, कुंती आणि द्रौपदी. शतकांपूर्वीच्या कथा-काव्यातून वावरणा-या. काळाची दीर्घ, अवघड वाट चालतांना व्यक्तित्वाची लहान सहान स्फुरणही जपत आपल्या मनापर्यंत येऊन पोहचलेल्या. आपण निरखतो त्यांना. त्यांच्या भावजगताचा पैस अजमावू पाहतो.समजू पाहतो त्यांच्या स्त्रीत्वाची जातकुळी,आणि पूर्ण्पुरुष कृष्णाच्या अथांग आयुष्याचा एखादा किनाराही त्यांच्या आयुष्यातून शोधू पाहतो. त्या तिघींची समजूत मोठी.थोड्या थबकतील,वर्तमानाला देऊन टाकतील त्यांचं देणं,आणि काळाच्या दीर्घ,अवघड वाटेनं पुढे जातच राहतील.

ह्या तिघी वेगळीच जातकुळी घेउन जन्माला आलेल्या,आजन्म देण्याचेच कर्तव्य पार पाडत आलेल्या. साधारण, सामान्य स्त्रीच्या जीवनापलिकडे जाऊन गवसलेल्या असामान्याच्या ताकदीवर आयुष्य घडविणा-या.

हे पुस्तक प्रस्तावनेपासूनच मनाची पकड घेत जातं. प्राचीन साहित्याची गौरव गाथा मांडतांना निघालेले शब्द पुढे मांदून ठेवलेल्या शब्द राशींची कल्पना देतात. शब्दा शब्दातून कृष्ण किनारा आपल्याला सापडतो आणि वैचारिक रपेट सुरु होते. कधी मनाची कालवा कालव, तर कधी मनाची घालमेल, तरी त्यातून कुठेही तोल ना जाऊ देता साधलेला समतोल मनाच्या निळाईच्या अथांगतेची पूर्ण जाणिव करुन देतो.

प्रस्तावनेतच "हे का लिहिलं?" हे प्रश्नचिन्हच सा-या उत्तरांना वाट करुन देतं. सहजगत्या अरुणाढेरे सत्य सामोरे आणतात.."हे परंपरेचं जग मोठं अद्भुत आहे !कधी तत्वज्ञानाच्या अतिसुंदर चांदण्यानं झगमगतांना, तर कधी मनाविषयीच्या खोल समजुतीच्या निळाईनं वेढलेलं असताना, तर कधी उदाताच्या, सर्वकल्याणाच्या उन्हात प्रसन्न हसताना, तर कधी सुख दु:खाच्या विविध रंगांनी बहरुन येताना ते जग पाहिल की, खरोखर आपण स्तिनित होतो. पण पृष्ठभागावरच्या नवलाईखाली तळघरही आहेत अंधाराची, आणि त्यातलं एक मला थोडसं दिसलं. पुष्कळ बायका तिथे मरुन पडलेल्या मी पहिल्या, कुणाच्या गळ्याला देवत्वाचं नख लागलेलं,तर कुणी पातिव्रत्याचं विष प्यालेलं.कुणी निरागसतेचाच कलंक लागून मेलेली.तर कुणी समाज पुऋषाच्या कठोर मिठीत घुसमटून गेलेली.काही झगडल्या होत्या,तर काही ताठ मानेनं जगल्या होत्या. काही अबोल सोसणा-या होत्या. मी एकदाच ते विलक्षण दृष्य पाहिलं,पण आजवर ते विसरु शकले नाही. त्या तळघराच्या अंधारातून येणारा मृत्यूचा वास वेळी अवेळी मला अस्वस्थ करुन टाकतोच आहे. डोळे मिटले की त्या असंख्या बायकांपैकी कुणी ना कुणी मला दिसतेच आहे. कुणी देवळात देवी होऊन बसलेली.कुणी नाटक सिनेमातलं एखादं पात्र म्हणुन आलेली.....या अनुभवातून बाहेर यायचं कसं? एक उपाय म्हणून लिहावसं वातलं.त्या लिहिण्याची ही अगदी लहानशी सुरुवात आहे. फक्त तिनच तुकडॆ..."

राधा ,कुंती आणि द्रौपदी बद्दल कथारुपाने लिहिले आहे..एक एक प्रसंग जणू आपल्या समोर घडत जात आहे एखाद्या चलत चित्राप्रमाणे असेच वाटते. आधी व्यासपर्व वाचल्यामुळे, दूर्गाबाई भागवतांच्या अभ्यासात्मक लेखांचा मनावर पगडा जास्त बसल्यामुळेही,काही ठिकाणी काही बारकावे प्रभावी नाही वाटत. मूळ महाभारत आणि मांडलेल्या स्त्री पात्राच्या व्यक्तिरेखा ह्यात कधी कधी थोडी तफावतही आढळुन येते. पण एक कथानक म्हणुन असामान्य अशा पात्राच्या मनाचा गर्भ उलगडतांना त्यात एक सामान्य मनही आहे ह्याची तीव्र जाणिव होते. स्त्री जातीचा पिंड हा एक आहे आणि तो एकमेकींच्या जीवनाशी कुठे ना कुठे साधर्म्य साधतो हे जाणवु लागते.

तिनही व्यक्तिरेखा मांदतांना लेखिकेला द्रौपदीने भूरळ पाडली आहे हे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकीच्या तोंडी असलेले द्रौपदीचे उच्चारण प्रत्येक पात्राला कृष्ण किना-याबरोबर कृष्णेची झालरही देऊन जातात.

पहिला परामर्श राधेच्या जीवनाचा घेतला आहे. अनेकांप्रमाणेच इथेही राधा ही एक प्रेयसीच्याच रुपाने अवतरते.
राधा खरच प्रेमिका होती का? हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात येतो. कारण कृष्णाने गोकुळ सोडले तेव्हा तो इनमिन सात आठ वर्षाचा होता आणि राधा त्याच्यापेक्षा बरीच मोठी होती.अशा स्थितीत त्यांच्यात प्रेम संबंध होते की ते वात्सल्याने परिपूर्ण असे नाते होते?  हा प्रश्नांचा सारा डोलारा मनात घेउन "राधेला" वाचले. प्रेमिकेच्या भुमिकेतून योग्य वाटणारे असेच हे कथानक.
एक दिवस आचानक राधा द्वारकेत कृष्ण महालात येउन पोहचते आणि तो तिला सागर किनारी असलेल्या मंदिरात भेटण्याचे वचन देतो. इथुनच भूतकाळाची आणि वर्तमानाची घालमेल सुरु होते.जे सोडुन आलो कायमचे ,ज्या कडे कधी फिरुनही पाहिले नाही ते असे अचानक समोर येणे..आनंद मानावा की हळवी जखम पुन्हा ओली झाल्याच्या वेदनांत विव्हळावे अशीच काहीशी कृष्णाची स्थिती.
शब्दांतून आपण अर्थ शोधावे असेच काही ठिकाणी वाटते. कृष्ण राधेला सागर किनारी भेततो तेव्हा राधा त्याला विचारते," बासरी आणली असती, तर वाजवली असतीस रे पुन्हा !" यावर तो म्हणतो," नाही राधे. द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट.हा आवाज ऐकते आहेस ना पाण्याचा ? जोर बघ किती आहे वा-याला. इथे बासरी वाजायची नाही. आणि माझ्या जवळ आहे कुठे बासरी ! गोकुळातून निघालो तेव्हा तू ती जी हिसकावून घेतलीस,तिच्यानंतर बासरी आलीच नाही माझ्या हातात.मला वाजवायची नव्हती,म्हणून मग मिळविलीही नीही मी ती फार अट्टाहासानं"
गोकुळात मागे सारे सोडून कर्तव्यपरायण होऊन सारे जीवन जो राबला त्याला जेव्हा राधा विचारते,"तूझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला,हे तुला कधी समजल का रे नंतर." यावर कृष्ण जे उत्तर देतो ते थोडे निष्ठुर वाटते पण तितकेच तात्विकही.." तपशील नाही कळाला. म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दाम म्हणुन.त्याची जरुउर होती. खरच?".
्गोकुळातून निघाल्यावर जे घडणार होते ते माहितच ्होते तेव्हा मागाहून जे घदले त्याच्या खोलात जाऊन त्याची नव्याने काय माहिती होणार होती असे काहीसे तर म्हणायचे नाही ना?, असेच असावे बहुदा.
मी का आले ? ह्या राधेच्या प्रश्नावर जे तो बोलून जातो ते अनोखेच,ज्यातून एक वेगळा अनुभव एक वेगळी अनुभूती झाल्याची जाणिव होते.
राधेने आंतरबाह्य सारे कृष्णार्पण केले आणि तिला त्याने जीवनभर पूरुन उरेल इतके लसलसते जिवंत दु:ख दिले.ते तिने घेतले कसे?कुठे ठेवले? त्याचं काय केल? कशी जगली त्याच्याबरोबर ? एक ना अनेक प्रश्न चिन्ह....ह्या सगळ्या अनुभवांचे देणं आहे आहे..याचाच अर्थ जीवनाच्या प्रत्येक वळणावर तिची आठवण होती की तो तिलाच सर्वठायी शोधत होता? ह्याचा तपशिल पुढे येतोच.रुक्मिणी हरणात रुक्मिणीच्या धुंद चेह-यात त्याला राधा आठवते.भामेच्या रागात राधा आठवते,द्रौपदीच्या प्रश्नांत त्याला राधा आठवते...पदोपदी जे मागे सोडून आला आहे त्याचा साक्षात्कार त्याला पुढ्यात होत राहतो.
जेव्हा तो तिला क्षमा मागतो, मी चुकलो मला क्षमा कर म्हणतो .यावर तिचे उत्तर जणु ती त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाची साक्ष असल्यागतच वाटते. ती म्हणते," मी कोण तुला क्षमा करणारी? मी स्व:ताला भाग्यवान समजते. माझ्याकडे वळूनही न पहाता गेलास,पण माझ्याजवळ जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला आणि त्या क्षणांना तू मोहोळ होण्याची जादूही दिली होतीस. माझ्या जवळ एक विरहाचं दु:ख होतं लसलसणारं आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जागाच्या पाठीवर याचानिदान दिलासा होता. पण..पण तिने काय करावं? जिच्या केसांची आठवण ठेवून शिष्ठाईला गेलास,जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास.कृष्णेची लालूच कर्णाला दाखवून तिचाच की रे सौदा केलास ! तिच्यासाठी हा अपमान केवढा असेल?
आणि कृष्णा तिही किती मोठी ! तिनं सगळं सहज बंद केलं मनात.तू दिली असशील सफाई,युद्ध,धर्म,राजनीती, यांच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असशील. ती काय समजली नसेल? अरे जी द्यूत सभेतल्या तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते ,तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल? पण तिनं ते ही गिळलं माधवा... प्रेम फार जहरी असतं रे...फार कडू असतं गिळायला...मला विचार. तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेला आहे बघ.

पुढल्या एका प्रसंगात जेव्हा राधा म्हणते ," माझं फक्त तुझ्या अपुरेपणाशीच नातं होतं’ यावर तो मिश्किलीने म्हणतो,’ आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे. हे तू जेव्हा सहज स्वीकारलस ना, तेव्हाच माझ्या बरोबर, पुरेपणाशी तुझाही वायदा हौन गेला. हे तुला कळलच नाही बहुदा. मग उरलं त्या एक्क बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जाणं. त्या बिंदूवर आपण भेटणारचं होतो.’

जेव्हा तो तिला विचारतो,’तू सुखी होतीस मधल्या काळात?’
ती उत्तरते ,होतेही नव्हतेही, कारण माझ्यासाठी अनयाचं उबदार मन हे एक वास्तव होतं,विश्वास टाकावा असं वास्त्व होतं आणि दुसरी कडे तुझं दाट निळं प्रेम हेही एक वास्त्वच होतं. एक पार्थिव होत, दुसरं नव्हतं पण माझ्या मुठीत तर दोन्ही होतं, मी का सुखी नसावं? आणि भाबड्या कारणासाठी नव्हतेही - म्हणजे मला ही दोन्ही प्रेमं - ती दोन्ही सुखं घेऊन मिरवता नव्हतं येत.’म्हणुन खूप खंत केली आहे मी ! पण मग दिवस जात राहिले तसं कळलं मला देखील. कळलं की सत्य माहित असावं मनातून. जिवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा.पण ते उच्चारयचं असतं अगदी कधी तरी. वेळ आली तरच.तशी वेळ आज आली. शेवटी आज आली.’
यावर त्याचे बोल तिला यशोदामाईची आठवण करुन देतात...तो म्हणतो तू स्व:ताच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस  बये, हे तुला कळतं तर..तू खंत केलीच नसती’ तेव्हा तिला उमगत..’माझं अस्तित्वच एक मिरवणं आहे’ आणि हेच यशोदेने ओळखलं आणि शेवटच्या क्षणाला बोलावून सांगितलं, ’जर कधी काळी वातलं... वातलं त्या बघावसं< तर पाय मागे घेउ नको. मान अपमान ठेवू नको. लक्षात ठेव की, ते उपकार नसतील त्याचे ! त्याला भेटलीस तर त्यालाच सुखानं मरता येईलं’ असं म्हणुन तिनं त्याच सार बालप्ण तिच्या ऒटीत टाकलं आणि यशोदामाई मोकळी झाली. मात्र राधा कृष्णाला म्हणते ,’मला माझ्या स्व:ताच्या प्रेमाचाही वेढा पडला आहे. म्हणून तर आले इथवर.त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक लक्षात ठेव. ती आई होती. बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवडी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे.पण जगून जगून सगळ्या बायकांनी किती मऊ,किती उबदार केलं आहे त्याला ! त्याची घोंगडी माझ्या अंगावर येती, तर मीही यापूर्वीच सुटले असते. पण तसं नाही घडलं.मी तशीच उरले. कुडकुडत राहिले’ या तिच्या शब्दातली दु:खाची नस तिच्या मनाच्या खोल तळातल सार वर आणुन ठेवते.

त्यांच्यातील संवाद वेगळ्या पातळीवर येऊन पोहचतात.अनेक वेळा अनेक रुपके घेउन जीवनाचा अर्थ सांगून जातात. जेव्हा राधा द्रौपदीच्या स्वयंवराच्यावेळी असलेली कृष्णाची उपस्थिती आणि तेचे सावळे रुप अन तिचा यमुनेसारखा घमघमणारा सुगंध आपल्याला माहित आहे हे सांगुन कृष्णाच्या मनाचा ठाव घेते. गर्द रंगांच्या झिम्मडीत रंगून जाणारी ती कृष्णेला कृष्णाने भारंभार वस्त्रे पुरवल्यावर तृप्त होऊन निरंग होते यातून खुप काही अर्थबोघ होतो.तर सा-या प्रसंगातूनही निवळपणे पाण्यासारखा कृष्ण वाहत गेला, समुद्रासारखा त्या त्या वेळी रंगुन निघालास. पुन्हा कोणत्याही प्रसंगाची साधीशी खुण वा व्रणही नाही यावर त्याचही मार्मिक उत्तर येतं’ जगण्याची चव गेली बघ.खूप खारट,खूप तुरट लागतं आहे आयुष्य. युद्धानंतर राखेची चव कशी असायची? समुद्राचा विस्तार जेवढा अतळ असतो सई, तेव्हडाच त्याचा खारटपणाही अटळ असतो. त्याला गोडं राहाया येतं नसतं. वाटलं तरी’

जेव्हा तो म्हणतो,’ अनय हे माझचं मला एक चिर्वांछित रुप आहे,हे तुला ठाऊक कसं नाही?’ यावर ती हतबल होऊन स्व:ताला सावरते इथेच खुपसे अर्थ गवसतात.

जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा तो तिचा निरोप घेउन न वळता निघतो त्यावेळी ती म्हणते अरे मी तुला भॆटायला आले तर मी तुझा निरोप घ्यायचा तर तूच माझा निरोप घेऊन निघालास....इथे या क्षणालाच असं वाटतं की ठा या भेटीचा अंत नाही तर परत फिरुन येणारी सुरुवात आहे.

दुसरी व्यक्तिरेखा कुंतीची.
कुंतीलाही माडतांना लेखिकेला द्रौपदीचा मोह सुतला नाही आहे. पदोपदी ती तुलनात्मक वा सरळ द्रौपदीचा उल्लेख करते. ह्या स्त्री रेखा एकमेकांत गुंतल्या सारख्या वाटतात. त्यामुळे कुंतीवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखे वाटते.

कुंतीचे आयुष्य हे काही शब्दात रेखाटणे कठीणच. तिची ओळख ही पांडवांची आई  म्हणुनच राहिलेली.
तिचा विचार करायला गेले तर ती एकटीच आई होती, जे पुत्र होते ते तिचे एकटीचे..तिच्या रक्तामासातून जन्माला आलेले तरीही तिची ओळख बाजुला सारुन ज्याचा अंशही त्यांच्यात नाही अशा पंडूचे बनुन राहिलेले. तिला तिचे मातृत्व स्व:ताचे म्हणुन असे गाजवताच आले नाही.पंडु होता तेव्हाही आणि नव्हता तेव्हाही ,त्याच्याच सावलीत मिसळावे लागले.

कुंतीचे व्यक्तिमत्व समोर आणतांना ,ते हळूवर पणे उलगडत असतांना अनेक रंग सामोरे येतात..
अल्लड वयातली रात्री पाहिलेली चंद्रकोर असो वा दुर्वासांचा वर आणि त्यातून पुढे मार्गस्थ होत जाणारा प्रवास.
गांधारीशी युद्धपूर्व आणि युद्धानंतरचा आलेला संपर्क,वेगळ्या कोनातून कुंतीबरोबरच गंधारीच्याही मनाचा ठाव घेतात.
जेव्हा गांधारी विचारते,’कुंती तुला शूरसेनाच घर आठवतं का ग?’ इथे कुंती आपण दत्तक गेल्याच दु:ख विसरु शकत नाही त्याच बरोबर ते शल्यही.
आणि त्याचबरोबर गांधारीने मोकळेपणाने केलेली मनाची उलगड बोलून जाते.’गाधांरच माझं सोसायचं बळ होतं गांधाराच्या कोवळ्या आठवणींवर मी केवढी वर्ष काढली आहेत. तुला कळायच नाही.’
कुंती इथे विषादाने हसते आणि मनातच संवाद साधते..की हीच बहिणीची कमकुवत बाजू शकुनीने हेरुन सारी विषबिजे हस्तिनापुरात पुरली..

पुढे जेव्हा दोघींच्या संवादात भीष्मांचा उल्लेख येतो तेव्हा तिच्या जीवाची तळमळ पुढे येते आणि नकळत बोल निघतात.माझ्या द्रौपदीची परवड डोळ्यांनी पाहिली यांनी आणि यांच्या पाया पडावं आपणं? त्यांना शापावं इतकी तळमळले मी."
गांधारीही जुन्य आढवणींनी उदास होते.मुलांच्या हिडीस कृत्याची आठवण जग कधीही विसरणार नाही आणि क्षमाही करणार नाही.तरी तिला पितामहांच श्रांत मरण आठवतं आणि ती विचारते द्रौपदीच्या क्षमेशिवाय तसं मरण त्यांना शक्य होतं असं म्हणावं तरी कसं? यावर कुंतीही खेदाने म्हणते’ माझ्य सुनेनं क्षमा क्लीच होती त्यांना.म्हणून तर माझी जीभ मी उचलली नाही.’
कर्णाबद्दाल तिची ओढ आणि खर्ची घातलेला जन्म ह्या सगळ्यांची सल तिच्या शब्दांतून व्यक्त होते जेव्हा ती म्हणते’ तू पुढच्या जन्मी कुवारपणी आई झालेली कुंती हो माधवा,किंवा फार कशाला, नुसती बाई म्हणून जन्माला ये ! इथे असे वाटते की ती महाभारतातल्याच नव्हे तर सा-या स्त्रीकुळाचीच प्रातिनिधित्व ्करते आहे.

द्रौपदीशी मी धृताराष्ट्र व गांधारी समवेत वनात जाणार आहे ही सांगतांच तिने उच्चारलेल्या शब्दांतुन तिने द्रौपदीच्याही मनाचा थांग घेतला आहे हे प्रक्र्षाने जाणवते,’मी तुझ्या प्रेमाबद्दल विचारते आहे कृष्णे ! एक सांग, मी वापररेलं हे संबोधन उत्तरासाठी पुरेसं आहे?"

मातृत्वाच आवरण पूर्णपणे नष्ट होऊन फक्त एक स्त्री म्हणुन आपण उरलोय ह्याचा उल्लेख करतांना ती द्रौपदीला सांगते. द्युतसभेतेल्ल तुझे धिंडवडे बघुन माझ्या तली आई मेली. ही षंढ पोरं आपली नाहितच अस वाटल. युधाचे वारे वाहू लागले तसा माझ्यातल्या आईने थोडा तग धरला.कर्ण मेला तरी थोदा तग धरलाच होता.आणि जेव्हा मी माझं आणि कर्णाचं नातं सांगितलं आणि युधिष्ठिरानं शाप दिला तेव्हा माझ्यातली आई पूर्णपणे नष्ट झाली ! उरली ती फक्त बाई ! एक स्त्री. मी फक्त कुंती उरलेयं
यावर जेव्हा द्रौपदी तिला विचारते की मला कधी अशी सांती मिळेल का? या तडफडीतून सुटका होईल का?  तर, कुंतीचे उत्तर ’शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा ’समर्पण’ असतं, हे तुला माहित आहे? मागचा पुढचा विचार न करता अशावर तरी ओवाळून टाकयचं स्व:ताला, आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वत:ला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व नाही सोडता येत. शांतीची ती वाट तुला आता क्शी मोकळी असायची? स्वत्व राखणं ही गोष्ट फार मोठी बये,पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून.’

Friday, September 24, 2010

आभाळाचे गाणे....रविंद्र भट

रविंद्र भटांच्या लिखाणाची सर्वांत आवदती बाजू म्हणजे त्याचे लिखाण खुप ओघवते असते. भाषा शैली अगदी घरातल्या सोवळ्यासारखी. मनात गुंजत रहाणारी. पुस्तक वाचून झाले तरी परत परत त्या कथेकडेच मन धाव घेत रहाते. ’आभाळाचे गाणे’ खुप अथांग आहे. असे गाणे ज्याला गवसते आणि त्याचा अर्थ ज्याच्या पदरी पडून तो त्याचे सार्थक करतो ते आयुष्य खरच कारणी लागते. सुरुवातील हे आभाळाचे गाणे पुढे येणा-या विस्तृततेची पायरी दाखवून टाकते.

क्षितिजावरची सीमारेषा कवेत घेणे
आभाळाचे गाणे ॥ धृ ॥

सूर्यरथाच्या अश्वासंगे,
गुरूशुक्राच्या भ्रमणासंगे,
दिक्कालाचे बंधन तोडुन,
अनंतरुपी उरणे ॥१॥

असेल जेथे सजीव सृष्टी,
करणे तेथे पायस वृष्टी,
मातीमधल्या वात्सल्याला,
स्पर्शून जागे करणे ॥२॥

ज्वालामिखिची दूर्गम शिखरे,
 रण वाळूचे कोठे विखरे ।
जलचर भूचर सर्वांवरती,
 नील छत्र मज धरणे ।३॥

यज्ञ घडावा सदा अलौकिक,
स्वर हृदयातुन उमटो सात्विक ।
जगन्नियता म्हणो तथास्तु,
तम दुरितावे विरणे ॥४॥

भाऊ बंदकीला टाळून दामोदर्पंत आपली पत्नी सावित्री आणि विधवा बहिण गोदाक्का यांच्या समवेत फणसावळ सोडून वाईकडे प्रस्थान करतात. तिथे रास्त्यांच्या आश्रयाला येतात आणि कृष्णेच्या तिरावर वसलेल्या आसगावची आणि गणकेश्वराची आजीवन सेवा करण्याची शपथ घेतात. सावकारी करतांनाही प्रहिले ध्येय गरजूची मदत हेच ठेवून जाती धर्म,गरिब श्रीमंत असा भेदभाव टाळून एकीचा मंत्र सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच इतर सावकारांचा रोष पत्करतात तसाच बहिष्कारही. पण लहान पणापासूनच एकीचे आणि समानतेचे बाळकडो ते आपल्या मुलाला सदाशिवाला आणि यमुनेला पाजतात. यात पदोपदी सावित्री आणि गोदाकका साथ देतात. आपण जे करतोय त्याचे परिणाम काय होतील हे ठाऊक असुनही ते पाऊल मागे न घेता पुढे जात रहातात. सदाशिवाच्या मुंजीला कोणताही गावातला भट ब्राह्मण येणार नाही असे कळते तेव्हा ते वाईकडे निघतात आणि सदाशिवाला सांगतात तुझी मुंज झाली की आपण कुळदेवतेचा गोंधळ घालू. हा गोंधळ का आणि कशासाठी हे जेव्हा सदाशिव उर्फ आप्पा विचारतो तेव्हा त्याला इतक्या मार्मिकपणे ते उत्तर देतात की आपल्यालाही त्या अनुभवातून जाण्याची इच्छा होते. ते म्हणतात,"गोंधळ म्हणजे आदिमायेच्या सगुणस्वरुपाला सज्जनांनी घातलेलं साकडं. सद्धर्माच्या संरक्षणासाठी ! सात्विक भावाच्या अभिवृद्धीसाठी ! स्व:ताच माणुसपण सदैव जागृत ठेवण्यासाठी ! माणसाच्या मनी जन्मत:च एक राक्षस असतो. तो सदैव दान मागत असतो. क्रोधाचं ! मदाचं ! लोभाचं ! मोहाचं ! मत्सराचं ! कितीही आहुत्या घातल्या तरी त्याची भूक कधीही सरु पाहत नाही. मग तो गिळायला लागतो सा-या माणूसजातीला. त्याच्या चांगुलपणाला ! त्याच्या वात्सल्यभावाला ! त्याच्या भ्रातृभावाला ! जन्मदात्या आईचं काळीज मागतो आपली हावरट भूक भागविण्यासाठी ! हिरण्यकश्यपू होऊन पोटच्या पोराची खाण्दोळी करतो ! प्रत्यक्ष परमेश्वरालाही लत्ताप्रहार करायला मगं पुढं पाहात नाही...! आणि या सा-यातुन होतो लय ! सा-या स्रुष्टीचा ! तिच्या सर्जनाचा ! तिच्या उदरातले नवनिर्मितीचे कोवळे गर्भ उदरातच चिरदले जातात ! मनातल्या राक्षसाच्या जो आहारी जातो,तो होतो दुर्जन ! फक्त स्व:ताच्या स्वार्थाचा विचार करणारा. तो होतो लंपट. फक्त स्व:ताच्या भोगासाठी धावणारा...! या राक्षसाच्या आहारी जो जात नाही, तो सज्जन.तो देवमाणूस. त्याला हवी असते शांती ! त्याला हवा असतो सहवास ! त्याला हवा असतो निरामय, नि:स्वार्थ आनंद ! त्याला व्हायचं असतं आकाश. सा-या धरित्रीवर पांघरुण घालणारं ! त्याला व्हायचं असतं वाहणारी नदी. सा-या तहानलेल्यांची तहान भागविणारी ! आणि या सा-यांसाठी त्याला हवा असतो आशीर्वाद. सृष्टीकर्त्याचा. आदिमायेचा ! या आशीर्वादाची अतिशय करुणपणे केलेली प्रार्थना म्हणजे संतसज्जनांनी देची पुढे मागोतलेला जोगवा ! तिला जाग येण्यासाठी घातलेला गोंधळ...!!

पुढे मोठा झालेला आप्पा ,वडीलांची धुरा आपल्या खांद्यावर सहज पेलून घेतो. सावकारी गेलेली असते.मिळकत तुटपुंजी असते.यमुनाही सौभाग्य लेणे ्गमवून माघारी आलेली असते.तरी ते हरिजनांना आपल्यात सामावुन घेण्याचा प्रयत्न करतच रहातात. गांधींजीच्या तत्वांना आपले करुन लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. पारतंत्र्य कसे घातक आहे. त्यासाठी कशी पाऊले उचलावी लागतील ह्याचे ते समर्पक विश्लेषण देतात.त्यांना सदैव साथ गावचा बयाजी पाटील देतो आणि जन्मभराचे पांगळेपणही पदरात पाडून घेतो. आप्पाना मिठाच्या सत्याग्रहातले मिठ विकल्यासाठी तुरुंगवास भोगावा लागतो. त्याच्या मागे यमुना त्यांनी सुरु केलेली शाळा चालवते पण स्वातंत्याचे पाठ पढवते म्हणुन तिलाही तुरुंगाची वाट दाखविली जाते. पुढे दोघांचीही सुटका होते पण खंगलेल्या प्रकृतीमुळे यमुनेचा जीव शांत होतो.
आप्पा घरात नसतांना जमिनीची सालदारी करणारा भिमा परिस्थितीचा गैरफायदा घेउ पहातो तर त्यावेळी खटाशे खट या उक्तीला साजेसे असे आप्पाचा मुलगा गजानन,पिरोजी ह्या रामोश्याची मदत घेतो.
गावाची प्रगति हवी असेल तर आपल्या मुलाने शिकले पाहिजे हे कळून आप्पा गजाननाला पुण्यात पाठवतात तिथुनच त्याच्या संपर्क वृत्तपत्रांशी येतो आणि लढा वेगळ्या पातळीवर येउन पोहचतो. सामाजिक परिस्थितीची जाणिव ही गावातल्या बदलांवरही अवलंबुन आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. गांधी हत्येनंतर गावोगावी ब्राह्मणाची घरे जाळली जातात त्यात त्यांचेही घर भस्मसात होते आणि त्यातच आप्पाची बायकोही.
पुढे गजानन अमेरीकेला जातो.
स्वातंत्र्योत्तर जी प्रगतीची पाऊले पडू लागतात त्यातच कृष्णेवर मोठे धरण बांधण्याचे थरले जाते आणि त्यात  आसगाव आणि अशी अनेक गावे बुडीताखाली जाणार असे निश्चित होते.गावातील लोकांना इतर ठिकाणे प्रस्थापित करण्यात येते असते. पावसाळ्याचे दिवस असतात. कृष्णामाई दुधडी भरुन वाहत असते. आसगाव रिकामे व्हायला सुरुवात होते. आप्पा गणकेश्वराच्या मंदिरात जातात. पाण्याचा लोट येतो. आणि गणकेश्वरासकट आप्पाही जलसमाधिस्त होतात.

गजानन परततो...आणि बातमी देत असतो..मी गजानन सदाशिव भावे...एकेकाळी इथे आसगाव होते...

Thursday, September 9, 2010

’दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’...गौरी देशपांडे

दुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन कथा.
गौरी देशपांड्यांच्या कथांचे वैशिष्ठ्य म्हणजे स्त्री जीवनाचे विविधांगी रुप. स्त्री मनाची आंदोलने आणि त्याचा ठाव अगदी समर्थपणे त्या मांडतात. त्यांच्या कथांतील नायिका ह्या परिस्थितीला शरण जाणा-या असल्या तरी त्यातुन स्व:ताचा मार्ग चोखंदळ्पणे निवडून स्व:ताच्या अस्तित्वाची जाणिव सर्वांना करुन देउन मार्गस्थ होणा-या आहेत.
दुस्तर हा घाट मध्ये अशी एक सर्व सामान्य घरातील नायिका नमु, आई वडिलांचे छत्र नसल्यामुळे या ना त्या नातेवाईकांकडे वाढलेली. जिथे ज्या घरी असेल त्या घराच्या परिस्थितीला रुळुन स्व:तात बदल घडवून आणण्याची सहजता तिच्या अंगी आलेली आहे. कोणा नातेवाईकाने तिच्या शिक्षणात कधी आडकाठी केली नाही.
महाविद्यालयात प्रवेश केल्यावर तिचे इंग्रजी भाषेबद्दलचे, साहित्याबद्दलचे प्रेम तिला इंग्रजी भाषेचे शिक्षक हरिभाई ह्याची सर्वात आवडती शिष्या बनवते आणि त्यातुनच तिची ओळख त्यांचा मुलगा वनमाळीशी होते आणि मैत्रीची परिणीती विवाह बंधनात. लग्नाला होकार देण्यापूर्वी हरिभाई तिला विचारतात की तुझा हा निर्णय सर्व विचार केल्यानंतरच तू घेतला आहेस ना? त्याचे सारे गुन्हे माफ करुन त्याला तू नि:खळ प्रेम देऊ शकशील ना? या वर ती काहीच बोलत नाही तसेच तिला हरिभाईंच्या प्रश्नामागचा हेतूही कळत नाही.
लग्नानंतरचे दिवस म्हणजे स्वप्नझुल्यावरच्या हिंदोळ्यासारखे सरत जातात. एकमेकांत गुंतत जातात. मग अवचित पणे वनमाळिचा मित्र अलिस्टर प्रवेश करतो.त्याच्यात तिला एक खरा मित्र भेटतो ज्याच्याजवळ ती मनातला सारा मळभ रिता करु शकेल इतकी पवित्र मैत्री त्याच्यात होते.
अलिस्टरची बदली वनमाळी आपल्याबरोबर भारतात करवून घेतो. एक दिवस अचानक अलिस्ट्रच्या बायकोकडून वनमाळीचे दुस-या स्त्रीशी असलेले संबंध कळतात. प्रथम अविश्वास वाटावे असे हे विधान जेव्हा सत्याचे रुप घेऊन समोर उभे रहाते तेव्हा ती आतून पोखरुउन गेलेल्या खांबागत होते. आयुष्यात जीव तोडून केलेल्या प्रेमाची अशी प्रतारणा व्हावी ह्यांची खंत मनात सलत असतांनाच ती घर सोडून हरिभाईंकडे त्यांच्या गावातील घरात राहायला जाते. तिथेच पुढे शिकायचा निर्णय घेते. पण PhD साठी तिला मुंबईत वनमाळीकडेच जावे लागेल इथुन तिला पुढचे शिक्षण शक्य नाही असे जेव्हा हरिभाऊ सांगतात. तेव्हा ती सहजतेने परत विरलेल्या वाटेवरुन घरात प्रवेश करते. अभ्यासाच्या खोलीला स्व:ताच्या खोलीचे रुप देते आणि नव्या जोमाने शेक्सपिअरच्या प्रेमात पडते. थकलेले हरिभाऊ जगाचा निरोप घेतात.
गावातल्या वास्तव्यात तिची सखुबाई, तिचा मुलगा काळू याच्याशी जमलेले वात्सल्याचे नाते गहिवरते. नकुल ह्या आर्मी मधील पाय गमावून बसलेल्या सैनिकाशी औपचारिक मैत्री होते. साधी सरळ राहाणी हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनुन रहातो. तरी जुनी नाती ती तोडत नाही.्वनमाळी बद्दलची ओढ वा त्याची तिच्याकडे घेतली जाणारी धाव कमी होत नाही. जेव्हा तिला त्याच्या आईचे मतिमंदत्व आणि त्याने त्यावर स्व:तासाठी घेतलेला निर्णय की ज्यामुळे नकळत मातृत्वाच्या अनुभवाला पारखी झालेली नमू एका तठस्थ भूमिकेतून आपले नाते सांभाळते.सा-या मनांतील भावनांना कायमचे कोंडून अशाररिक प्रेम वनमाळीला देते. जेव्हा तो परत येण्याची तिला साद देतो तेव्हा दुस्तर अशा घाटावर ती एकटे रहाणे कबूल करते.

दुसरी कथा "थांग" ह्या कथीतील एक धागा मला नकळत पाऊलो कोलिओच्या ’ब्रिडा’ या कथेची आठवण देउन गेला. तो धागा म्हणजे 'Soulmate' .
कालिंदि नंदन बरोबर भारत सोडून परदेशात रुळू पाहातेय. कंपनीच्या जवळच सगळ्यां सहका-याची वसाहत असते. तिथेच वेगवेगळ्या देशातून आलेल्या सहका-यांच्या परिवांशी होणा-या भेटीगाठी, त्यांची औपचारिकता,त्यातील सहजता तर कधी फोलपणा हे साध्या सरळ आणि एकदम कोणात न मिसळणा-या कालिंदिला हळू हळू समजु लागतो. त्यात तसेच काळ्या सावळ्या रंगामुळे तसेच घरातील पैशाच्या चणचण परिस्थितीमुळे लग्न  न ठरु शकणा-या कालिंदिला अचानक नंदन सारख्या गैर मराठी पण तिच्याच ऑफिस मध्ये मोठ्या हुद्द्यावरअ सलेल्या नंदनने घातलेली मागणी,लग्न आणि नंतर तिने गमवलेली तिची मंद अपंग मुलगी मंदा.ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी बाळगुन असणारी कालिंदी. चार चौघातही नंदन तिचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. वेळेवेळी केलेला तिचा उपमर्द जणु तिच्या अंगवळणीच पडल्यागत झाले आहे. जर कधी तसे घडले नाही तर त्याचे तिला नवल वाटते. ह्या त्याच्या स्वभावला मोड घालतात त्याचे वरिष्ठ सहकारी दिमित्री आणि सहसहकारी इयान.
दिमित्री आणि इयान यांना कालिंदि बद्दल एक ओढ आहे. प्रत्येकाची आपली एक सांसारिक कहाणी आहे. दिमित्रीची बायको सर्वांत सुंदर ’आंगलीकी" तर इयान्ची बायको सुझी ही कर्तव्यदक्ष पण नव-याच्या बहकेल पणाला ओळखून असणारी आणि कालिंदिला सावध करणारी. इतर जोडपी विलेम-रने, बिरेन्द्र आणि कल्पना.
दिमित्री कालिंदिच्या मनातील डोहाच्या तळाशी पोहचून तिचा थांग घेऊ पहाणारा तर इयान वर वर उथळ पाण्यात तिच्या शरिराकडे आकर्षित होणारा.ते मिळाल्यावरही परत ओढ घेणारा.
दिमित्रीच्या स्वभावात एक संयम आहे, समतोल आहे.जे आवडतय ते ओरबाडून घेण्याची इच्छा नाही. त्या आवडीचा थांग घेण्याची प्रबळ आकांक्षा आहे. एका अपघातात विकलांग अवस्थेत दवाखान्यात पलंगावर असतांना कालिंदीला झालेली अनुभूती तिला त्याच्या जवळ खेचते. ती मनाने पूरण्पणे त्याच्यात गुंतते. नंदन फक्त शरीराचा स्वामी उरतो.तरी शेवटी ती परत भारतात परतण्याचा ाणि नंदन पासून वेगळे होण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ही नंदन अगदी व्यवहारीक बोलतो पण शेवटी उच्चारतोच की तू दिमित्रीकडे जाणार ना?

thang  vilem rane, iyan suzi, dimitri aangoliki, birendra kalpna.....kalindi nandan kanta.

ललित नभी मेघ चार....शान्ता ज. शेळके

शांता  शेळकेंच्या कविता असो वा त्यांचे इतर साहित्य असो त्यांच्या इतर सर्व लेखनांमध्ये त्यांच्या ललित लेखाचे वैशिष्ठ्य अनोखे आहे. मनात येणारे सहज विचार शब्दरुपाने दृश्य रुप घेउन जेव्हा मनापर्यंत पोहचतात तेव्हा एक अनोखा आनंद वा अनुभव होतो.

ललित नभी मेघ चार मध्ये शांता बाईंनी आपल्या काही निवडक नव्या जुन्या  २८ लेखांचे संकलन केले आहे.

"अथ लेखनपुराणम्" ह्या लेखापासून ह्या ललित संग्रहाची सुरुवात होते. ह्यात शब्दांचे अभिजात रुप व स्वरुप ह्याबद्दल तर त्यांनी आपले विचार मांडलेच आहेत त्याच बरोबर शब्दांचे जीवनातील अविभाज्य असे स्थानही अगदी सहज रित्या मांडले आहे.समोर शुभ्र करकरीत कोरा कागद आल्यावर मन कसे लेखनाला आतूर होते आणि मनात चाललेल्या असंख्य विचारांना कागदावर मांडण्यासाठी हातही अधिर होतो हे सांगतांनाच त्याना किव येते ती त्या लोकांची जी लेण्या ऐतिहासिक ठिकाणे झाडे दगड इथेही आपली नावे कोरुन आपल्या भेटीची साक्ष ठेवून जातात. त्यांना हे लिखाण कधी विकृति वाटते तर कधी आंतरिक गरज.
सहजगत्या त्या लिहुन जातात,"शब्दांइतकेच त्याच्या लिखित रुपालाही महत्व असते. शब्दांचा आशय आपण मनाने वाचतो,तसे त्याचे दृष्य रुप आपल्या डोळ्यांना हवेसे असते. शब्दांच्या योगाने मनात उमटणा-या भावनासंवेदना हे जर शब्दब्रह्माचे निर्गुण रुप असेल तर शब्दांच्या दृष्य आकृती हे त्याचे सगुण रुप आहे."
शब्दांचे एकुण रुप अनेक प्रकारच्या भावनालहरी निर्माण करता ,कधी आकलनीय तर कधी अनाकलनीय.
त्यांच्या मनात अगदी आपल्याही मनात येणारा विचार येतो..मला लिहिण्याचा संकोच का वाटावा? अनेकदा मनात येते लिहायचे कशासाठी? हे वाचणार कोण? याचे महत्व केवढे? केवळ आपल्या क्षण्भंगुरतेची सलणारी जाणीव विसरावी,कशाच्या तरी द्वारा मरणानंतर चार दिवस जगात टिकावे, उरावे, इतरांच्या थोडेफार आठवणीत राहावे म्हणुन तर आपण हा लेखन प्रपंच करत नसु? माणसाच्या अंगी अनेक प्रकारचा दुबळेपणा आहे.त्यातलाच हाही एक दुबळेपणा असेल तर मग तो स्वीकारुन, मनोमन त्याची जाणीव बाळगून,जमेल तसे,न जमेल तसे सुद्धा लिहायला हरकत काय?


"मी कोण आहे?" ह्या लेखांत मनुष्याचा बालपण ते वृद्धत्वापर्यंतच्या प्रवासात आलेली स्वत:च्या अस्तित्वाची भौतिक ओळख होतांना ज्या कक्षा रुंदावत जातात, जी क्षितिजे विस्तारत जातात तो जीवन प्रवास उत्कृष्ट पणे मांडला आहे.
हा प्रवास अनुभवतांना त्यांनी लिहिले आहे ,"पण वय जसजसे वाढत चालले तसतसे माझ्या ध्यानात आले की, पायातली एक साखळी तुटली तर तिची जागा घ्यायला इतर कितीतरी साखळ्या पुढे येतात.डोक्यावरची एक जबाबदारी गेली तरी तिथे इतर जबाबदा-या आपल्या हजर आहेतच."
घर,जात, प्रांत, देश, भाषा,धर्म,इतिहास अशा पाय-या एकामागे एक ओलांडत आता मी अशा जागी येऊन पोहचले आहे की तिथून मागे वळून बघताना हे सारे खूप दूरस्थ,अंधुक वाटते.
हे सारे दिव्य पार करतांना कधी कधी स्वाभाविकपणे मनात येते की सारे हे पाश तोडावे.आपले आपण आपल्या सा-या क्षुद्रतेसह आपणच असावे असे वाटते.आभाळाने टाकली आणि धरणीने झेलली इतके मला भोवतालच्या या सा-या बंधनांपासून मोकळे नाही का होता येणार?मी स्वतंत्र अशी कधी होइल का?माझी केवळ मीच अशी आत्मनिर्भर,आत्मपर्याप्त अवस्था मला कधी लाभेल का? जसा आभाळात तरंगणारा ढग,जशी वा-याची स्वैर झोळूक,जशी पावसाची हलकीशी सर,जसे एखादे पान किंवा फूल तशी मी मुक्त,नुसती केवळ अशी असेन का?

The Conquest of Genghis Khan...by Alison Behnke

Unaccustomed Earth ..Jhumpa lahiri

Unaccustomed earth book comprised of eight stories which are about the Bengalies settled in US or England.
The first story is Unaccustomed Earth.
Unaccustomed earth is a first story of this book. It tells about a relationship between a father and daughter,Roma. After a sudden death of Roma's mother, She misses her. She feels her mother's presence around her at every moment in her life since then. When her father visits her home in Seattle , she feels some reservation about her father stay with her forever, but at the same time she shows concern about her fathers loneliness also. Her father starts exploring different places in the world to curb his loneliness without his wife. during one of his visits , he meets Mrs Bagachi , a bengoli widow and they become good friends.He wants to tell about his friendship with Mrs Bagachi to his daughter but is never able make it. And without telling her about his new girlfriend he leaves the house.during his stay at her house he makes her garden beautiful by planting different flower plants and bushes. He also gets mingled up with his grandson Akash. In the end of the story Roma gets a letter written in Bengali by his father to Mrs Bagachi and she reacts in different way but soon understands his father and posts it.

The second story is hell Heaven. A tale of a family friend who comes closer to family and eventually goes away leaving his impact on family which is told by the girl from the family.
Pranab Chakraborty a guy from wealthy family from Calcutta when comes to US he becomes a very close family friend of Shyamal's family.After his arrival the life of Shyamal's wife changes.Pranab's casualness and his free nature brings happiness in her life.They start visiting nearby places,talk often about their mutual interests.One day when Shyamal's wife comes to know about his engagement with Deborah,she feels sad and jealous about Deborah . and says that this relationship will not last for long.Pranab gets married to Deborah and drifts out of Shyamal's family . For breakup of this family relationship Shyaml's wife blames Deborah.Suddenly after few years Deborah calls Shyamal's family for their marriage anniversary.Few years later Deborah and Pranab gets separate by divorce due to Pranabs extramarital affair with one of the Bengali woman everyone know.Deborah calls Shyamal's wife and tells that she always tried  to to get Pranab to reconcile with his parents and she also encouraged him to maintain ties with other bengalis but he resisted which surprises Shyamal's wife.Shyamal's wife never tells her feelings for Pranab to anyone except her own daughter.

The third story of this book is " A choice of Accommodations"
This is a story of Amit and Megan who lose their charm of life after few years of marriage due to family commitments and work but regain it after their visit to the Langford Academy, a boarding school of Amit for Pam Borden's wedding.

"Only Goodness" a story of sister and brother relationship.
Sudha always cares for Rahul.From childhood she becomes not only elder sister but a good mentor and caretaker of Rahul.She protects him and try to help him at every stage of life but at last due to his bad habits ,she breaks the strong bond of their relationship forever.

No body's  Business is a story of pretty,smart and still single Bengali girl Sangeeta.She lives with housemates Paul and Heather.She never discusses or shares anything about her personal life to them.One day she introduces Farouk,Freddy to Paul.After that he often finds Freddy at their apartment or Sang out with Freddy. One day Paul gets a call from Deirdre saying that she loves Freddy and they have intimate relationship. Paul tries to tell about the relationship between Deirdre and Freddy to Sang but she denies it by saying that Freddy doesn't have any friend.Paul decides to prove himself and calls Deirdre and at the same time tells sang to be there on the another extension of the same phone.When Paul asks Deirdre about her relationship with Freddy,she confesses all about them and in addition she says that Freddy has such kind of relations with other women as wel.He likes to depend upon women for his daily needs so every woman feels that he can't live without her.Broken hearted Sangeeta leaves the country forever.

Second part of this book comprised of a three stories of Hema and Kaushik's family.
Kaushik's family shifts from Bombay to US and temporarily lives with Hema's family.For few days Hema's mother happily do everything for them.During this stay Kaushik's mother always takes rest or goes for shopping which makes Hema's mother angry.But when she comes to know about her last stage of cancer, she feels simpathy for her.Kaushi's family shifts to a very huge and grand house and after some days kaushik's mother dies.Kaushik leaves the house and goes to university for further study.From the childhood he likes photography.During his stay at hostel,one day his father calls him and tells about his second marriage.In the vacations he visits home and meets his stepmother and two step sisters.He always misses his own mother in the house and one day without teling any one leaves home and never ever comes back to home.After few years his father also shifts to a small house near to Bengali community. Kaushik joins the international journalism.He visits many countries,war places.During his stay in Rome he meets Hema through their common friend and a new realaton flourish between them.At last Kaushik asks her to be with him but she tells that she is already engaged with Naveen and leaves for India.Kaushik also visits Phuket,Thialand.
Hema watches the news of Tsunami and  massive surge of  water in the costal area of Thialand.

Monday, September 6, 2010

व्यासपर्व ...दुर्गा भागवत

महाभारत आणि महाभारतातील पात्रे हे कायमच मानवी जीवनाचे तसेच मानवी स्वभावाचे विविध पैलू दर्शन घडविणारे महाकाव्य.व्यासपर्व या पुस्तकात दुर्गा भागवतांनी त्यांना दिसलेली प्रत्येक पात्राची रुपे अभ्यासात्मकरित्या समोर मांडली आहेत.यांत कोणत्याही व्यक्तिरेखेचा विनाकारण बडेजाव नाही की विनाकारण कोणाच्याही स्वभावाचे खच्चीकरण नाही.जे जसे दिसले ,वाटले तसे ते प्रामाणिकपणे मांडले आहे.
भाषाशैलीही एका वेगळ्याच काळाचे स्मरण करुन देते.
व्यासरचित महाभारता बद्दल बोलतांना त्यांची लेखणी सहजरित्या लिहुन जाते,"प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यातल्या समतोलात व्यासाची नाट्याची धारणा निपजेली आहे.नाट्यातली नाट्ये महाभारतातच पहावी.इतकी दृष्ये विविध छटांत,विविध रंगांत, विविध नादांत,कधी वर्णनांत,तर कधी संभाषणांत,तर कधी नुसत्या सूचनेत व्यासाने सढळ पेरुन ठेवली आहेत."
"व्यासाचे अनुपम नाट्यवधान ज्या त-हेने प्रकट झाले आहे,ती त-हाही फार नाजूक आहे.सुक्ष्म व तरल आहे.
महाभारतात सत्व रज तम या त्रिगुणात्मक स्वभावरचनेच्या असाधारण भानामुळेच व्यासाला महाभारताच्या अगणित व्यक्तिरेखा क्षणाक्षाणाच्या कृतीच्या आलेखानुसार कोरता आल्या,जिवंत करता आल्या,हाडामासाने भरलेल्या मनस्वी व्यक्ती म्हणुन दाखवता आल्या.यामुळेच खलत्व एका व्यक्तीत कोंडून ठेवून खोटे किंवा मानीव मानवी आदर्श निर्माण करण्याचा खटाटोप त्याला करावा लागत नाही.’
व्यासाच्या धर्मावगुंठित कलेचा विशेष हाच की ती लेण्यांतल्या शिल्पाप्रमाणे ज्याला जसे बघण्याची इच्छा असेल,ज्याची जशी पात्रता असेल,तसे त्याला अनुकूल असे आंतरिक विश्व प्रेक्षकांत,वाचकांत वा श्रोत्यांत खुले करते.व्यासाची प्रतिभा क्रांतदर्शी आहे ती याच अर्थाने की ती क्षुद्र,संकुचित ,सव्यंग,पापपूरित,कुरूप व्यक्ती व घटना यांनाही सरळ आत्मसात करते.केवळ नीती सौंदर्य, भव्यताच तिला प्रिय आहे असे नाही. हा समभाव केवळ स्व:ताच्या निर्मितीकडे अति अलिप्त व अतोजागरुक दइष्टीने पाहाणा-या प्रतिभावंतालाच साध्य असतो.विश्वरुपदर्शन हे या व्यापाराचे प्रतीक मानायला हरकत नाही.नियतीचा खेळ हे महाभारताच्या कथेचे महत्वाचे सूत्र असले तरीही,एक सत्य सतत भासमान होत राहते.मानवाची भौतिक नियती इतर जीवसृष्टीप्रमाणेच आहे;परंतु मानवाचे आत्मिक जीवन हे सर्व भौतिक अविष्कारापलिकडील चिन्मय शक्तीशी निगडित आहे;हे सत्य महाभारतातील दैववादाच्या बुडाशी आहे.."

व्यासांनी ,मानव कितीही विकसनशील असला तरी अंतर्गत संघर्ष त्याला अटळ आहे हेच मुख्यत: लहान मोठ्या स्खलनातून दाखवित गेले.या अनंत स्खलनाच्या परिपाकाला त्यांनी "दैव" म्हंटले आणि त्या दैवाच्या विराट लीलेत मानवी जीवनाचे धागे दोरे कसे गुंफले आहेत हे पावलो पावली कर्मगतीच्या तत्वज्ञानाच्या आधारे दाखविले आहेत.
एव्हडेच नाही तर कर्माच्या पलिकडचेव अज्ञाताचे भानदेखील मानवाच्या आत्म्याला येऊ शकते,ही श्रद्धा सर्व नैराश्याला, सर्व भीरुतेला व साशंकतेला दूर सारते आणि मग त्या अज्ञात सत्याच्या प्रतीक्षेची तीव्र,उन्मनस्क उत्कंठा सर्व व्यवहारांना, भैतिक व्यापारांना व भावनांना, त्यांचा साचा जराही बदलू न देता, नव्या आशयाने भरुन ताकते. आणि म्हणूनच ’तमसो मा ज्योतिर्गमय’ या अओपनिशदिक वचनाचा काव्यमय व प्रत्य्क्श प्रत्ययही महाभारतातुन येतो.
दुर्गा भागवतांनी महाभारतातील पात्रांचे विश्लेषण १० भागांतुन केले आहे.
पूर्णपुरुष कृष्ण मध्ये कृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या निर्वाणापर्यंत त्याच्या प्रत्येक अवस्थेचे कार्य,कर्म व त्याची सांगाती मांडली आहे. एक अवस्था टळली की तिजकडे कधी मागे ना वळून पाहाण्याचे त्याचे वास्तवाचे भान हे वेगाने महाभारताला पुढे नेते तर त्याच बरोबर मानवी जीवनाचे सत्य मांडुन जाते.

मोहरीतील ठिणगी मध्ये एकलव्याचे भोक्तृत्व, द्रोणाची पिडा आणि त्यामुळे त्याच्या मनात निपजलेला हिनतेचा भाव एक वेगळाच पैलू समोर आणला आहे.
दृपदाकडुन झालेला अवमान,लहानग्या अश्वत्थाम्याचे दुधासाठी रुदन...असे एकानंतर एक घडत जाते आणि नियतीने की प्रकृतीने केलेले मानवी जीवनात तसेच स्वभावातले परिवर्तन मांडले आहे.
आणि या स्वभाव परिवर्तनामुळे जे दु:ख(?) एकलव्याच्या वाटेला आले वा जी भळभळ्ती जखम घेउन अश्वत्थामा अजुनही वणवण रणरण भटकतोय ह्याला जबाबदार द्रोण आयुष्यात कधीच सफल होत नाही.ना गुरु म्हणुन ना एक पिता म्हणुन तो कुठेतरी कमीच पडतो.हे जितक्या क्लिष्ट्स्वरुपात महाभारतात दाखवले आहे त्याला तितक्याच सहजतेने दूर्गा भागवतांनी सहज सोपे करुन मांडले आहे.
ह्याची पुढील पायरी म्हणजे अश्वत्थाम्याचे जीवन कोंडलेले क्षितिज मध्ये मांडले आहे. कोंडलेले क्षितिज हे नावच खुप काहे सांगुन जाते..भव्यता,दिव्याता आणि अथांगता.

"यक्तिरेखा हरवलेला माणुस" मध्ये दुर्योधनाच्या जीवनावर प्रकाश घातला आहे.
अंध माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेला,लाडाकोडात वाढलेला ,स्वबुद्धि योग्य दिशेन न चालवणारा एक पराजित पुत्र,राजा.मात्र सदैव जीत असा मित्र.

"एकाकी" मध्ये कर्णाच्या जीवनाचा जो आढावा घेतला आहे तो विचारांचे एक मंथन घडवुन आणतो.
कर्णाच्या व्यक्तिरेखेला मांेडतांना व्यासांनी कुठेही हात मागे राखला नाही आहे. जीवनात कर्ण चूकतो पण त्या चूकीच्या करणीचे त्याला फळही मिळते. सत्य त्यापासून लपलेले नाही तरी तो उघडपणे सत्याला स्वीकरुन पांदवांची बाजु घेत नाही अगदी कृष्णाने द्रौपदीचा मोह दाखविला तरी तो दुर्योधनाशी असलेल्या मैत्रीच्या वचनाला जागतो.तो दानशूरा पेक्षाही दानविर आहे कारण आपली कवच कुं्डले गेली तर आपसूक आपला पराजय आहे आणि आपल्या मित्राची हार आहे हे त्याला माहित आहे. हे असे करण्यामागचा त्याचा उद्देश काय? सारी वासना सर्व कटु कर्तव्याच्या भावना सारे पीळ आणि समर्पणाची परिपूर्ती आहे का ही? कर्णाचे मरण तर या सम्र्पणाच्या क्षणीच निश्चित झाले आहे.
पैलु न पादलेल्या हि-या सारखे कत्र्णाचे व्यक्तित्व आहे.त्याच्या अंतरात तेजोगर्भ आहे. बाहेर खडबडीतपणा.

"परिकथेतून वास्तवाकडे" अर्जुनाचे व्यक्तिमत्व मांडले आहे. कुंतिचा पुत्र,पांडवातला उतकृष्ट धनुर्धर,द्रौपदीचा प्रियकर, कृष्णाचा प्राणसखा असे आणि कितीक व्यक्तिरेखा.

"मुक्त पथिक" मध्ये पूर्णत्वाची ओढ लागलेल्या ज्येष्ठ पांडवाची अर्थात युधिष्ठिराची प्रतिमा मांडतांना व्यासांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना एक वेगळाच साक्षात्कार देउन जाते. तीन कौंतेयांचे तीन रंग आहे. यांत युधिष्ठिराचे व्यक्तिमत्व सर्वात नेटके आनि उमदे.
या ज्येष्ठ बंधू म्होरक्या आहे याच अर्थाने की त्याच्या वचनात त्याचे बाऊ आहेत. पण जिथे क्रिया आली तिथे हा आपला छायेत जातो आणि भावांकडून या त्या क्रियेची फलश्रुती झालेली पाहतो.स्वत: हा कधीच पुढे झाला नाही.पण क्रिया ओसंडली आणि तिच्याभोवतीचे अन्मादाचे अवसान जिरले , की एक प्रकारची सून्य पोकळी निर्माण होतेच.तशी पोकळी निर्माण झाली,की तिच्यात फिरुन चैतन्य ओतून,नव्नुतन क्रियेचे बीज पेरून,आपल्या भावांच्या कर्तृत्वाला पूर्णत्व आणू पाहाणारा फक्त युधोष्ठिरच.कारण युधिष्ठिराला तहान लागलेली होती ती पूर्णत्वाची. अपूर्णतेची त्याची जाणीवही त्यामुळे इतरांपेक्षा अधिक प्रगल्भ व धारधार होती.प्रत्येक भावाच्या क्रियेमागे युधिष्ठिर आहेच. कधी तो क्रियेला प्रोत्साहक, तर कधी विरोधीही असतो.

अश्रु हरवल्यावर या लेखांत भीष्मा बद्दल लिहितांना शब्द कमीच पडतात असे ते व्यक्तिमत्व आहे.या व्यक्तित्वाची उच्चता आणि खोली इतकी आहे की हा लेख अपूर्ण आहे असेच वाटते.

माणसांत विरलेला माणूस मध्ये विदुर..एकाच पित्याचे संतान असुनही दास्यत्वाची जी मोहर घेउन जन्माला आला आणि त्याला जन्मभर जागला. आणि जगतांना सत्याची साथ आणि सत्याचरण आणि सत्यपदेश करित जीवन व्यतीत केले.

कामिनी या लेखात द्रौपदीची कथा आणि व्यथा दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.द्रौपदी हे महाभारतातील असे एक पात्र आहे की जिचे दु:ख कधीच कळूनही मांडता येत नाही.सर्वकाही मिळुनही रिकामीच झोळी घेउन जिवंतपणीच जळत रहाणारी शापित स्त्री.

Saturday, August 28, 2010

MY Father's Notebook by Kader Abdolah.


My Father's Notebook is a story of Aga Akabar , a mute and deaf man which has been told by his son Ismail while deciphering the notebook of Aga akabar written in cuniform.
This story starts in a small village Jirya, near Teharan in Iran.Hajar marries to a nobleman Aga haldi Khorasani and becomes his sigeh wife.She gives birth to seven children.Aga Agabar,the youngest borns a deaf and mute.During first month only she comes to know about his deafness and muteness and she tries to hide him from every one.When Kazem Khan,Hajar's brother comes to know about his nephew, he calls his sister and tells her that he will help her.He also tells her not to hide child from world. He promises her that he will teach him the special language of deaf and mute.When Aga becomes 9 yera old his mother dies and he starts living with his uncle.One day Kazem khan takes him to the sacried caves of Saffron mountain and shows him cuniform incriptions of old Persian king and tells him to observe and learn.
After coming back to home kazim khan gives him a notebook and pen and tells him to scribble whatever he wants and thus Aga Akabar starts writing all his thoughts in his own code cuniform language and he keeps writing till the end of his life.After his death his son Ishmail gets this notebook through courier and he starts deciphering the code language of his father and starts revealing his life story.
Through father's notebook only Ishmail comes to know about his father's first marriage, sacred well of saffron mountain,Raza Shah's railway track etc etc.Ismails starts telling his fathers story as well as his own life simultaneously.

From his childhood Ismail becomes the mediator between his father and the world.He always acompanies his father wherever he goes.Ismail becomes Aga Akabar's voice.


ह्य पुस्तकात आग अकबर नावाच्य बहि-या आणि मुक्या माणसाची जीवन कहाणी त्याच्या मुलाने, इस्माइलने सांगितली आहे.

तेहरान पासुन चार पाच तासाच्या अंतरावरील जि-या नावाच्या गावात जन्माला आला.त्याची आई तेथील जमिनदाराच्या घरी काम करत असते आणि त्यांच्या संबंधातून जन्माला आलेला हा त्यांचा तिसरा मुलगा. हा जन्मत:च मुका व बहिरा असतो.

Friday, January 29, 2010

Reading Lolota in Teharan....by Azar Nafisi

Beyond the Horizon... Short stories From Contemporary Indonesia... Edited by Devid Hill

This book is comprise of 22 short stories from Indonesia.
All these stories are previously published in local magazines or news paper and are most of them are translated in english by Devid Hill.
These stories show the different colour of the life of an Indonesian life. While reading I thought on any part of earth the one thing of human can not be changed is his 'nature".
Among these stories I liked ...A Letter ...a story of a middle aged woman with children and husband. Husband is away from his family for further studies and is not in contact with his wife and children for more than a year.She is wating for her husband's letter.One day she gets a news from a person of her village about her husbands life style and after hearing she becomes panic and wants to write a letter with all of her anger...and  throughout the nigh she writes one after another letter.. but burn them all and ends with a new letter stating care and love messege."but I am sure you are missing us for more. You have never written, but we know it's only because you are busy,or perhaps there are things which prevent you from writiing. All of us at home will always try to be a comfort to you.Stay healthy and try to look after youeself properly for us. I'll keep on writing to you,to keep you company while you are busy. we're all well  and proud of you. You are the pride of your sons and my most prized possessions......

Jakarta....A story of two brothers....poor and rich.....

Matias Akankari....a story of a man from west Irian who accidentaly visits Jakarta and enters in the so called high class club. At the end he comes bank to his native place and says,"High class in Jakarta are just the same as in West Irian " they all only cover their genitals!

Coming Home... is a very touching story of husband and wife.

one night @call center

Two states...story of my marriage

Sunday, January 10, 2010

Madras On Rainy Days....Samina Ali

The Winner Stands Alone....by Paulo Coelho

Brida



"Magic is a bridge,"a bridge that allows you to walk from the visible world over into the invisible world,and to learn the lesson of both those worlds."

" When you find your path, you must not be afraid. You need to have sufficient courage to make mistakes. Disappointments,defeat, and despair are the tools God uses to show us the way."

Miracles couldn't be explained ,but they existed for those who believed in them.

"I learned that the search of God is a dark night,that Faith is Dark night.And that's hardly surprise really,because for us each day ia a dark night.None of us knows what might happen even the next minute, and yet still we go forward. Because we trust. Because we have Faith."

"The Truth is that if the Anima mundi were merely to keep dividing,it would keep growing,but it would also become gradually weaker.That is why,as well as dividing into two, we also find ourselves. And that process of finding ourselves is called Love. Because when a soul divided it always divides into a male part and a female part.
That s how the book of genesis explains it :   the soul of Adam was split in to two and Eve was born out of him."

Humanbeings are all interlinked, like the cards in deck.

"Sometimes we set off down a path simply bacause we don't believe in it. it's easy enough. All we have to do then is prove that it isn't the right path for us. However, when things start to happen, and the path does reveal itself to us, we become afraid of carrying on."
So many people chose to spend their whole life destroying paths they didn't even want to follow, instead of following the one path that would lead them somewhere.

" when we set out on the path, we always have a fairly clear idea of what we hope to find.Women are generally seeking their soulmate, and men are looking for Powe.Neither party is really interested in learning.They simply want to reach the things they have set as their goal.
"But the path of magic - like the path of life- is and always will be the path of Mystry. Learning something means coming into contact with the world of which you know nothing. In order to learn, you must be humble."

" Everything in the Universe has life, and you must always try to stay in contact with that life. It understands your language. And the world will begin to take on a different meaning for you."

" With the exception of a few creature who are descended from the angels -- and who need solitude in order to encounter God ---the rest of humanity will achieve Union with God if, at some point, at some moment in their life, they manage to commune with their Soul Mate."

" In the Night of Time, when we were separated ,one of those parts was charged with nurturing and maintaining knowledge : man. He went on to understand agriculture, nature and the movements of the stars in the sky.knowledge was always the power that kept the universe in its place and the stars turning in their orbits.That was the glory of the man - to nurture and maintain knowledge.And that is why the whole human race has survived.
"To women was given something far more subtle and fragile, but without which knowledge makes no sense at all,and that thing was transformation. The men left the soil fertile, we sowed seeds, and the soil was transformed into trees and plants.
"The soil needs the seed,and the seed needs the soil.Theone only has meaning with the other.It is the same thing with human beings. When male knowledge joins with female transformation,then the great magical union is created, and its name is "wisdom."
"wisdom means both to know and to transform."

"God is the word. Always be very careful what you say in any situation and at any moment."
"God manifests himself in everything,but the word is one of his most favored method doing so,because the word is thought transformed into vibration;you are projecting into the air around you something which,before,was only energy.Take great care with everything you say,"
"The wor has more power than many rituals".