Wednesday, May 9, 2012

माती आणि माणस..... अरुणा ढेरे


माती आणि माणस
अरुणा ढेरे

पुस्तकाच्या नावावरूनच त्याचा बोध होतो. जशी माती तशी माणस.
माती पाहिला गेले तर स्थुलरुपी सगळीकडे एकच आहे. पण तिचा रंग, तिचा पोत, तिची पाणी धारण करण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात जेव्हा तिच्यातून उगवायच असत.
परमेश्वरानेही सगळ्याना एकाच मातीतून उगवल पण प्रत्येकाची पोट हा निराळाच. अशाच निराळ्या आणि विरळ्या महान लोकांचे अनुभव ह्या छोट्याश्या पुस्तिकेत आहेत. अगदी अवघ्या एक दीड पानांचे हे अनुभव अयुष्यभराची शिदोरी देऊन जातात. एक जरी अंगिकारता आला तरी ह्या जन्माचे भाग्य.

गाव झुला



काही पुस्तके अशी असतात की ती वेड लावतात, पलटणा-या पानाबरोबर आपलेही विचारचक्र फिरत रहाते."गाव झुला" हे अशा पुस्तकापैकीच एक आहे. ४३ लघु ललीतांना सांधून बनणारा एक दीर्घ ललित.

पुस्तकाचे मुखपृष्ठ , मातीवर उपडी पडलेली भिक्षेची खापरी आणि काठी जणू निर्मोहाचे प्रतीकच ! मलपृष्ठावरील म.. देशपांड्यांची कविता ह्या पुस्तकाचे जणू सारच !!

एका बैराग्याचा प्रवास, जो शोधाला निघाला आहे. कोणाच्या ? कशाला? आणि का ? अशांसारखे अनेक प्रश्नाचे गाठोडे घेउन. आईने आळवलेली गाणी स्मरणी ठेवून, वळण वाटान्वर पुढेच जायचा ध्यास घेऊन चालतोय.

अनेक प्रश्न सदोदित मनात रुंजी घालतात, पावले थबकतात, मागे वळण्याची इच्छा होते. शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं. हे गुरुचे शब्द  त्याना वंद्य मानून गुरूची आज्ञा न मोडता पुढच्या अविरत प्रवासाला निघतो. त्याच्या प्रवासाबरोबर आपणही हा नवखा प्रवास करतो. त्याच्या प्रश्नांत आपणही गुंततो, तो गुंता आपलाच बनतो. त्याच्या शोधाबारोबर आपण आपलाही शोध घेऊ लागतो.

पुस्तकाची लेखणी खिळवून ठेवणारी आहे.एकदा हातात पडल्यावर ,एकादमात वाचून टाकण्यासारखे हे पुस्तक नक्कीच नाही आहे. हे मुळी पुस्तकच नाही आहे - हे एक "चिंतन" आहे. जे परत परत होत रहाते. विचारांचे मंथन करत रहाते.

भाषा साधी आहे, कधी सरळ तर कधी वळणा वळणाची, पण मनापर्यंत पोहचणारी. त्यातले विचार मनात कोरून ठेवणारी. साधी साधी रूपके , ओळी परत परत वाचायला भाग पाडतात , जसे " मूळ बुंध्याशी पडलेली सावली धरून झाडं स्तब्ध उभं होत . किंवा , "आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’

या प्रवासात मोहाला थारा नाही. त्यावर मात करायला तो निघाला आहे पण कशी कार्याची हे त्याला अनुभवातून आत्मसाद करायचे आहे. म्हणूनच ,"वाटेत मन लावायचं नाही अन वळणापाशी अडखळायचे नाही " अशी गुरुची आज्ञामानून अविरत प्रवास सुरू ठेवतो.

प्रश्नाना घाबरले नाही तर त्यांची उत्तरेही आपसूकच मिळतात ह्याची त्याला अनुभूति प्रवासात होते. म्हणूनच लेखक सहजगत्या लिहून जातो, "तो कधी कुठे अडखळला नाही. अनेक गावं , राने वने पार करणा-या प्रवाशाच्या पावलांनी वाटा घडू लागल्या . घनदाट जंगलातही स्वयंभू वाटा असतात . जाणत्या पावलांनाच त्या सापडतात .त्यासाठी पावले मात्र तयार हवीत. गवताचं पातंही दुखावलं तर हळहळणारी अन काट्यांनी दुखावलं तरीही ओरड न करणारी पावलं असली की जंगलातल्या वाटा सापडतात".

दु:खदायी घटना ह्या क्लेशदायी असतातच तरी सुखदायक घटना ह्या मोहात गुंतवून ठेवून अधिक वेदनादायक ठरतात. ओरखडे जसे दुखावतात; मखमली स्पर्श देखील वेदानादायीच असतो. सवय लावतो आणि बांधून ठेवतो . दु:खाचे काढ आणि सुखाची गुंगी दोन्हीही सवयीचा भाग बनतात . घर करतात. त्याच्यासाठी घरे तुटतात देखील . मग घर घडवायचाच कशाला ? कशाला घालायचा हा घाट? हा प्रश्न त्याच्या मनात डोकावतो पण त्याच्याशीही तो सलगी करत नाही आणि मार्गस्थ होतो . त्याला कशाचाच मोह पडत नाही , अगदी भूकेचाही नाही . कोणी जोंधळा देऊ केला तर तो पाखराना देऊन निमूट आपली वाट चालत रहातो . त्या जोंधळ्याचे ओझ त्याला पेलवत नाही आणि ओझ्यामागे चाल राहाणे हे त्याचे प्राक्तन नाही .म्हणूनच ह्या बैराग्याचे सारे काही अप्रूप आहे तो आपला सदोदित चालत रहातो .

या पुस्तकात जागोजागी पुराणातल्या कथा रूपकात्मक पेरल्या आहेत. सरळ सरळ व्यक्तीचा वा पात्राचा उल्लेख ना करता अपरोक्ष रीत्या मूळ उद्देश वाचकापर्यंत पोहचवण्याची धडपड दिसून येते.

बैराग्याच्या कल्पनाच निराळ्या , कधी तो वेड्यासारखा धावत सुटतो . का तर? मोहापासून दूर जाण्यासाठी.
तर कधी वाटेत पडणारे गाव निर्मल, लख्ख करतो. कारण गाव हा त्याचा जिव्हाळ्याचा. गाव जर स्वच्छ तर मनही स्वच्छ यावर त्याचा गाढ विश्वास.

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्यांचे भयानक जीवघेणे प्रकार तो उघड्या डोळ्यांनी पहातो आणि त्याची खात्री पटते 'जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’

सुरुवातीला गुरुभेट घेऊन निघालेला बैरागी , अनेक वेळा गुरूला अप्रत्यक्षरीत्या अनुभवतो , कधी त्याच्याच विचारातून तर कधी नकळत भेटलेल्या वाटसरूत, नदी नाल्या ओढ्यातून तर कधी सरपटणा-या वा उडणा-या जीवातून.

काही ठिकाणी लेखाकाचा पूर्वग्रह त्याच्या लिखाणावर मात करत आहे हे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे वाचताना काहीवेळा निराशाही पदरी पडते.

लेखक विदर्भातील असल्यामुळे वैदर्भीय भाषेची पखरण करून अनेक नव्या शब्दांची ओळख होते.

हे पुस्तक एक दीर्घ ललित बंध असल्यामुळे तसेच लोकप्रभा सापताहीकातून हे लेख पूर्वप्रसिद्ध झाल्यामुळे
काही ठिकाणी तोच तोच पणा आला आहे , तरी तो कन्टाळवाणा वाटत नाही तर तो पुढच्या प्रवासाला पूरक असाच ठरतो.

गावझुला [दीर्घ ललितबंध]लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.




मुक्ता पाठक शर्मा

Thursday, April 19, 2012

अज्ञात झ-यावर रात्री.....अरुणा ढेरे

अज्ञात झ-यावर रात्री हे पुस्तक दुस-यांदा वाचले.
पहिले कॉलेज मध्ये असतांना वाचले होते आणि आता परत.
जेव्हा एखादी कलाकृती आपण दुस-यांदा अनुभवतो तेव्हा तिची अनुभूती ही पहिल्या पेक्षा निश्चितच वेगळी असते. ह्या पुस्तकाच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होते.
हे पुस्तक म्हणजे १५ पूर्वप्रसिद्ध लघु कथांचा संग्रह.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अरुणा ढेरे प्रत्येक कथेची पार्श्वभूमी सांगतात. अरुणा ढेरे ह्या आपल्या प्रत्येक लिखाणातून स्त्री ह्या भूमीकेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहातात. त्यामुळेच कदाचित त्यांचे लिखाण मला कायम आवडते. महाभारतातील स्त्री पात्रांबद्दल असलेली त्यांची ओढ ह्या पुस्तकातील कथांमध्येही दिसून येते. त्याच बरोबर संत स्त्रियांच्या आत्मशोधाचा मागोवा घेणा-या काही कथा समर्थपणे उभ्या रहातात आपल्यासमोर. तर काही लोककथा नव्याने जन्म घेतात.
मनोगतात त्यांनी सहजतेने सांगितले आहे,"एका परीने या संग्रहातल्या कथांमधून नव्या आणि जुन्या स्त्रीचे जगणे मी शोधते आहे. माझ्या जवळची , अनुभव , आणि समाज यांची पुंजी तशी फार मोठी नाही. पण बाल आहे ते तिचेच आहे. वाटते की, अतिदीर्घ आणि अतिविस्तृत असा काल आपल्यापुढे पसरला आहे.आजचे आपण - माणूस म्हणून, बाई म्हणून या काळाच्या हातून काही स्वीकारतो, काही नाकारतो. काही पेटत हाताने शोषतो, काही निर्धाराने गिळून टाकतो. या कथा म्हणजे त्या स्वीकार - नकाराच्या, 
शोषण्या- गिळण्याच्या  आहेत, असे म्हटले तरी चालेल."

पहिली कथा "पूजा" , या कथेची चौकट तंजावरच्या प्रसिद्ध बृहदिश्वर मंदिराशी निगडीत आहे. या मंदिराच्या कळसाची तळी गावातल्या एका वृद्धेच्या  दारातल्या शिलेची घडवलेली आहे. खुद्द बृहदिश्वारानेच नगराधिपती  राजाला स्वप्न दृष्टांताने त्याबाबतची आपली पसंती कळवल्याची स्थळ माहात्म्य कथा या कथेचा आधार आहे.
जयाम्माची सून पद्मा,  नवरा विश्वनाथ १२ वर्षापासून नाहीसा झालेला , कुठे गेला , का गेला याची कोणालाही खबरबात नाही. पद्मा नेमाने आपले कर्तव्य पार करत  एक सवाष्ण असूनही सन्यस्त जीवन जगत आलेली. त्या सन्यस्त जीवनाचे तेज तिच्या चेह-यावर दाटलेले. मनापासून शिवाच्या पूजेत रमून जाणारी जयाम्माची लाडकी सून.
घराच्या दारातली शिला बृहदिश्वाराच्या मंदिराच्या कळसाच्या तळी साठी योग्य ठरल्यापासून जयाम्माचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर शिवाने आपली प्रार्थना ऐकली आणि आपली पूजा सार्थकी लागली असेच तिला मनापासून वाटत होते. शेवटी कोणाची पूजा फळते हे इतक्या सहजतेने कथेत गोवले गेले आहे.

दुसरी कथा : अज्ञात झा-यावर रात्री.  रजू आणि रमा यांची आपली एकेकटीची व्यथा, एकमेकात गुंतून ही कथा समोर येते. १० वर्षानी एकमेकीसमोर समोर येणा-या  मैत्रिणी , वेगवेगळ्या मार्गावर आगेकूच झालेल्या, शेवटी एका वळणावर एकमेकीना भेटलेल्या. इतक्या दूर असूनही दोघीन्च्याही अंतरंगात समजुतीचे झरे झुळकत असणे ही एका अतूट बंधनाची / मैत्रीची ग्वाही देणारे. आणि ग्रेसच्या ओळीच्या गर्भित ओळींचा ओलावा जाणणारे  हे कथानक.कथा वाचल्यावाराही  ओळी मनात गाज देत रहातात 
" मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झा-यावर रात्री मज ऐकू येतो पावा ...."

तिसरी कथा " की आपुला ठावो न सांडिता "

की आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटिता ।
ऐसा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ।।

शाब्दिक अर्थाच्या  मागे धावताना अर्थ कधीच गवसत नाही. काही अर्थ हे अनुभावान्च्या अनुभूतीतूनच येतात. ह्या कथेचा परीघ असाचा विस्तृत आहे. क्षणभर ह्या कथेचे पात्र अजिता ह्या परीघाची परिसीमा जाणून न घेता आपल्याभोवती परीघाची मर्यादा  रेषा आखते तर जेव्हा सगळ्या गोष्टीन्मागचा अर्थ गवसू लागतो तेव्हा प्रत्येक नातातल्या  परिवर्तनाची उकल तिला होते.ह्या मार्गात वाटाड्या बनतात ते नाना आजोबा.

उमज -- चौथी कथा,

परिस्थिती सगळ काही शिकवते. पण सगळ्या गोष्टी उमजेपर्यंत एका आधाराची आवश्यकता ही लागते.  प्रत्येक झाड हे स्वयंभू वाढत नाही. एका विशिष्ट उंची पर्यंत यायला एखाद्या  झाडाला  आधार लागतो. 
अशीच काही अवस्था सांगणारी ही कथा. जयंत - बिंदा , आणि जयंत - गिरीजा यांच्या नात्याचा ठाव घेते.
जयंत हा आधार आहे तर बिंदा एक स्वयंभू तर गिरीजा आधार शोधणारी. एका वळणावर तिच्या ह्या अवलंबून असण्याच ओझ जयंताला वाटते. त्या ओझ्याला नाकारायाचीही हिम्मत म्हणण्यापेक्षा ,त्याला गिरिजाला दुखवायचे नाही. गिरिजाला जेव्हा स्व:ताच्या कार्यक्षमतेची जाणीव होते तेव्हा तीच स्व:ता हे ओझ हलके करते. 

"धुकं "
पिढीच अंतर , आजी नाती मधल्या नात्याचा सुंदर गोफ.
काळ बदलतो , घड्याळाचे काटे पुढे सरकतात , पिढी मधील अंतरे वाढतात. तरी स्वभावाची चाकोरी कधी बदलत नाही. कपडे बदलावे तसे बाह्य जग बदलते पण अंतरंग , मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म कधीच बदलत नाही.
या कथेत आजी तिच्या नातीला , अर्थात मुक्ता सहजपणे बोलून जाते ," पन्नास वर्ष उशिरा कोय लावली तरी आंबा तो आंबाच उगवायचा  मुक्ते ! "
"जग पुढे न मागे नाही. पन्नास वेळा बदला माती, पण झाड भुईवरच असत ना अन भुईचा बदल म्हणशील तर झाड तेवढा मानून घेत की नाही ? माणसाचाही तसंच असत बाई ! "
आजी   दुसरेपणाची, सासूची नावडती, सासूचे  अनेक अत्याचार सोसलेली तरी शांत . हे सोसण्याच बळ आल कुठून असा कायम प्रश्न पडलेला. आपण जी सारी शक्ती भांडणात वाया घालवतो तीच शक्ती आजीने साठवून ठेवली की काय शांत राहून ?

माती नांगरली , कडकडत उन अन बिलगणा-या पावसाचा प्रेमळ सहवासात तिला मिळाला की तिच्यात बीज चांगल रुजत. तसंच ह्या कथेतल्या आजीच. आजोबांचा प्रेमळ सहवास तिला सा-या दु:स्वासांवर मात करून जायचं बळ देतो. छळणारी सासूही शेवटी तिच्या मायेच्या सावलीत पश्चातापाने जळत - निवत जाते.

तसं पाहिलं गेल तर प्रत्येकाच्याच जीवनात परिस्थितीच धुकं दाटत, पण त्यातून सहारा देणारा वा आपुलकीचा , मायेचा जवळ करणारा स्पर्श सर्व काही सुकर, सुखकर करतो.

कथेच्या शेवटी आजी म्हणते , " माणसाचं आयुष्य असत तरी केवढ ?  एक ओवी गावी अन पैल पालखी जावी ."

सहावी कथा नात.

नंदिता , सुबोध आणि देवकी यांची. प्रेमाचा त्रिकोण.त्यातून उद्भवणारी मानसिक आंदोलने. याचाच घेतलेला  मागोवा. सरळ अपेक्षित वळणाने ही कथा संपते.

"आपण एकमेकांना "

ही कथा मनात घर करून रहाते, लग्न म्हणजे नक्की काय ? दोघांच एकमेकासोबत असण म्हणेजे काय? शरीरापलीकडे  जाऊन एकमेकांची गरज एकमेकांना असते आणि ती गरज शाररीक गरजेपेक्षाही मोठी असते. भावना, मन हे उमजल एकमेकांच तर सगळ आयुष्य सुकर बनत. छोटी मोठी वादळे आली तरी ती निभावून जातात. पण नात्यात हा ओलावाच नसेल तर ते शेवटी विस्कटत आणि तुटत. हेच सांगणारी ही कथा अवि आणि शोभा यांच्या नात्यातली परिणीती.त्याच बरोबर आबा , माई आणि सुमित्राचीही !

कधीतरीची गोष्ट.

"भुललासी   वरलीया रंगा ' असेच काही ह्या कथेतून सुचवायचे आहे.
तेजा , हट्टाने प्रेमविवाह केलेला , आता तिला तिचाच संसार निरस वाटतोय मन दुसरीकडे धावातय  आपण करतोय ते बरोबर आहे की नाही ह्याचही भान नाही , काय कराव काय करतोय ह्या शंकांच्या जंजाळात अडकलेली . दुसरीकडे रेणुका शांत सरळ वाट बघत थांबलेली. 



पानझड......ना. धो. महानोर

Thursday, March 22, 2012

Ganapati atharvshirsh

झेन गार्डन ----मिलिंद बोकील


झेन गार्डन या   मिलिंदा बोकिलांच्या कथा संग्रहात त्यांच्या पूर्व प्रसिद्ध झालेल्या ८ कथांचा  समावेश आहे.
पहिलीच कथा "यंत्र" नावाची आहे .एका महाकाय यंत्राची  कथा म्हणण्यापेक्षा त्या यंत्राशी   साधलेला हा एक संवाद आहे.
यंत्र दुरुस्ती करणारा 'हरिहर" आणि त्याच्या प्रयत्नांचा अंत पहाणारे यंत्र.

भाषा ओघवती आहे त्यामुळे वाचतांना मजा येते आणि पुढे काय होईल याची उत्सुकता लागून रहाते.
निर्जीव कारखान्याला वा यंत्राला ही जीव आहे असेच भाषेतून प्रतीत होते .
कारखान्याच्या अवाढव्य पणा बद्दल लिहून जातात .."महाकाय पंखे.अंतराळातून खाली उतरलेल्या असंख्य  ट्युबलाईट्स. पण त्यांचा पांढरा प्रकाश  लोखंडी पोकळीने शोषून घेतल्यासारखा .आणि सगळ्या हवेला एक लालसर गरम लोखंडी वास."
 प्रचंड महाकाय यंत्राचे  वर्णन करतांना त्याच्या भव्यतेची आणि ते  बिघडल्यामुळे शांत झाल्याची जाणीव शब्दातून करून देतात..."पाय पोटाशी घेऊन शांत पहुडलेले.भव्य निरागस..."

हरिहरचा सुरुवातीचा उत्साह , क्लिष्ट यंत्राचे दोष चुटकी सरशी सोडवण्याची त्याची हातोटी आणि त्यामुळे नकळत आलेला सार्थ गर्व /अभिमान हळू हळू कसा निरसत जातो. सुरुवातील यंत्राशी जणू युद्ध पुकाराल्यागतचा त्याचा अविर्भाव अगदी यंत्राला नाठाळ, खोडील,अडाणतट्टू आणि नंतर प्रेमाने हळूवार त्याला आंजारत गोंजारत त्याच्याशी केलेला संवाद एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात.

दुसरी कथा "अधिष्ठान".
कथेच्या नावावरून कथेचा गाभा प्रतीत होतो. गायत्री आणि विश्वनाथाच्या नात्याचे अधिष्ठान, त्यांनी पत्करलेल्या मार्गाचे अधिष्ठान की पत्करलेल्या मार्गाला पूर्णत्वाला नेण्यासाठी केलेले अधिष्ठान ! असे अनेक विचार मनात येत रहातात ही कथा वाचतांना.
स्थित्यंतर हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी काही वळणे परत लागतात. काळ पुढे गेलेला असतो, त्याच बरोबर त्या वळण वाटांवर अनेक बदल  घडून आलेले असतात. असे असले तरी मूळ प्रवृत्ती बदलत नाही. नात्यामधला ओलावा ते नातं  टिकवून ठेवते. अपेक्षांच्या ओझ्यात नातं दबून न जाता ते अपेक्षारहित प्रेमात ते फुलून रहात.

तिसरी कथा "निरोप"
ही कथा एक "स्थिती" आहे. जी प्रत्येकाने अनुभवली असेल अशी.
कधी न पाहिलेली माणसे  जिव्हाळा लावतात. आणि नकळत त्यांच्या  बद्दल आपुलकी वाटू लागते.
रामाकांताचेही असेच काही होते , जगण्या,राघो,कमल्या,आत्याबाई आणि अंजी ह्या सगळ्यांच्यात तो रमून जातो. अबोल नात्याचा  धागा त्याला आठवणींचा साठा देतो.

चौथी कथा ,"आभास"
बिरवाडीत रघुनाथ ,सिमतेरेझीया सिस्टरच्या मिशन मध्ये येतो, तेव्हा त्यांच्या बद्दल निर्माण झालेले कुतूहल, घरदार सोडून इतक्या दूरच्या देशात आणि तेही एका विराण गावात  मिशनच्या कार्याला वाहून दिलेला जन्म ह्या सगळ्या गोष्टी उकलू लागतात. ही कथा वाचताना कुठेही अवाजवी शब्दांचे अवडंबर नाही. संथ पुढे जात एका बिंदूवर येऊन एक आभास देऊन जाते.

पाचवी कथा ,"आरंभ"
World organization of anthropologist चा एक शास्त्रद्न्य कझान बेटावर जायला निघतो आपल्या सहका-याच्या, Walter च्या शोधात. तिथली आदिवासी जमात सगळ्या जगापासून अनभिज्ञ आहे. जगात महाविनाशी अनुयुद्ध सुरु झाले आहे. मानव जातीचा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने केलेला प्रयास ह्या कथेत वाचायला मिळतो. Walter  त्याच्या डायरीतील टिपणे,त्याचा हत्या करून लटकवलेला देह,  ह्या सार्या गोष्टी पुढे येणा-या घटनांची नांदी !
शेवटी जमेल तसे शिकान पर्वताच्या दगडात जे जमेल ते कोरून, शेवटच्या श्वासाबरोबर "आरंभ" होणारा एका नव्या युगाचा प्रवास ! 

सहावी कथा "साथीन"
प्रभाबरोबर एका राजस्थान मधल्या छोट्या गावात शिबिराला आलेली रेवती जेव्हा गावातील स्त्रियांचे धाडस, त्यांनी एकजुटीने केलेला अन्यायाला विरोध पाहून अचंबित होते आणि आपसूकच मनात दाटलेले मळभ बरसवून टाकून निरभ्र बनून परतते.
चंपा,मनकी,मितल, हिराबाई या सगळ्यांमध्ये तिला आपली मैत्रीण ,साथीन मिळते.

सातवी कथा, "पायऱ्या"
यशाच्या पाय-या चढून गेल्यावरही जमिनीवर पाय असणारा श्रीपाद, आणि जेव्हा तो कामगार  चळवळीचा भाग होता तेव्हा त्याच्या बरोबर असणा-या जया,अशोक यांच्या मधल्या मैत्रीची कथा. माणूस कधी पाया-या चढतो तर कधी पाय-या उतरतो....लाक्षणिक अर्थाने नव्हे तर कर्माने सुंदर रीत्या रेखाटले आहे.

आठवी कथा "झेन गार्डन"
जपान मध्ये झेन गार्डन ला भेट देणारी कल्याणी आणि तिला तिथे घेऊन जाणारा निरंजन यांच्यातला संवाद एका वेगळ्या अनुभूतीचे दर्शन देऊन जातात.