Sunday, February 16, 2014

तेरूओ आणि काही दूरपर्यंत………...गौरी देशपांडे

तेरुओ आणि काही दूरपर्यंत , या दोन लघु कादंबर्या आहेत गौरी देशपांडेंच्या . 
मुळातच गौरी देशपांडेंच्या प्रत्येक कथेची सूत्रधार म्हणा वा मुख्य पात्र म्हणा ही कायम एक स्त्रीच असते. 
विविधतेने नटलेली स्त्री पात्रे तीही परिस्थितीनुरूप स्व:ताला सक्षम करणारी वा दाखवणारी वा …। 
रुढीना तोडून वा डावलून जीवन जगणारी नायिका नेहमीच खास असते. तिच्या जगण्याचे मूल्य वेगळेच. ती कधी आपलीशी वाटते, कधी तिच्यातच प्रतिबिंब दिसते , कधी तिचा हेवा वाटतो कधी थोडी नाराजीही. पण इतके होऊनही तिचा साथ सोडावासा वाटत नाही. 
तेरुआ आणि काही दूरपर्यंत ह्या दोन्ही कथा आपापला साज घेऊन आलेल्या, वेगळ्या घाटणीच्या. शब्दांमध्ये अडकलात तर कधी न कळणार्या. पण सावध राहून एखाद्या  शब्दाला पकडता म्हणण्यापेक्षा उमजता आले तर त्या गवसलेल्या. 
दोन्ही लघु कादंब-या १९९० च्या दशकातल्या तरी आजच्याच वाटणा-यां हेच सदाबहार यश म्हणावे लागेल लेखिकेचे ! 

तेरुआ 
या कथेची सुरुवातच सर्व साधारण कल्पनेहून वेगळी. कथेच्या नायिकेला नाव नाही आणि त्याची गरजच भासत नाही. 
"कुठल्याही घडलेल्या घटना,मनात आलेले विचार, पडलेली स्वप्न , केलेली मनोराज्य असं काही सांगायचं म्हंटलं  की त्यांना  बांधणारी एक काळाची चौकात तयार होते; तसं  काही विशेष कारण नसताना त्याना एक सुस्त्रता येते; एक आधी घडलं , तर एक मागाहून, असा क्रम निर्माण होतो; गोष्टी जिथे घडल्या त्या ठिकाणांच वैशिष्ट्य त्याच्यात उतरतं;आणि तशातच व्यक्तींना नावं  व रंगरूप दिल की सांगणा-याच्या मनात असते त्याहून निराळीच आकृती ऐकणा-याच्या डोळ्यासमोर उभी राहते . " 
असे सुरुवातीलाच स्पष्ट करून नायिका "मी" म्हणून समोर येते. आणि मग आपणही मी म्हणूनच कथेबरोबर समोर वाहत जातो. 
तिची डायरी म्हणावी तर त्यात वर्ष तारीख काहीच नाही …. फक्त जपान मध्ये घालवलेले तिचे महिने. तेही एक वर्षाचा शेवट होऊन नव्या वर्षाकडे आगेकूच करणा-या डिसेंबर महिन्याने … मग त्या पाठेपाठ येणारी पत्रे कधी ती"तेरुआ" नाहीतर कधी  "जी" ना लिहिलेली. जी ना लिहिलेली पत्रे त्यांच्या  पर्यंत पोहोचलीच असावीत पण तेरुआला लिहिलेली पत्रे त्याला पाठवली असावीत का हा प्रश्न मनात रहातोच. 
"मी" जनक अर्थात नवा-याबरोबर जपान मध्ये आलेली , विविध देश फिरून त्यांचा अनुभाव म्हणण्यापेक्षा आस्वाद घेऊन आलेली. 
ती स्वछंदी  नाही आहे पण एखादी गोष्ट आवडली तर त्यावर निस्सीम प्रेम करणारी , भक्ती करणारी …. पण त्यात अडकून वा गुंतून न पडणारी . असं  खरच जगता येत का? कदाचित येत असाव , जेव्हा सभोवतालची आवरणं  बाजूला सारून , जे आवडत ते मान्य करण्याच धाडस वा कबुली ते ही स्व:ताशी देता आली तेव्हा असं  नक्कीच जगता येत असावं . 
जनक आणि तिच्यात  नुसता बंध आहे नात्याचा , आधी केलेल्या प्रेमाचा आणि आताही ती करत असलेल्या  unconditional प्रेमाचा (?) . 
जपान मध्ये आल्यावर तिला या अनोख्या देशातील अनोख्या लोकांचा त्यांच्या लोकमान्य प्रथित रिवाजांचे नावलाही वाटते. कधी हिंदुस्थानाला रूढीवादी म्हणणारी क्षणभर जपानी लोकांच्या वागण्यामुळे चकीत होते. पण ती अशा गोष्टीत अडकत नाही . म्हणूनच ती प्रथामादार्शीच तेरुआच्या प्रेमात पडते …। तिचे हे प्रेमात पडणे अल्लड  वयातले नाही तर चक्क चाळीशीच्या आसपास पोहचल्यावर जडलेले प्रेम ते ही पहिले वाहिले नाही .  ती ते तेरुआपासून लपवूनही ठेवत नाही


Monday, April 1, 2013

"झिम्मा आठवणींचा गोफ......" विजया मेहता

"झिम्मा आठवणींचा गोफ......"





मराठी माणसाचे आणि रंगभूमीचे एक आगळेवेगळे नाते आहे. नाटकांची आवड नसलेला मराठी माणूस विरळाच !



नुकताच मराठी नाटकान्च्या विश्वात प्रायोगिक नाटकान्ची एक अनोखी सुरूवात करणा-या विजया मेहतांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या मुहूर्तावर त्यांच्या "झिम्मा आठवणींचा गोफ......" आत्मचरित्राचे नुकतेच ४ नोव्हेंबरला प्रकाशन झाले. हे आत्मचरित्रापेक्षा नाट्यविश्वात एकरूप झालेल्या विजयाबाईचे स्व-कथन आहे. प्रायोगिक रंगभूमी कडून व्यावसायिक रंगभूमी कडे झालेला प्रवास ज्यात अविरत नाट्यवेड्या विजयाबाईची अभ्यासू वृत्ती द्र्ष्टीस येते.

एखादे पुस्तक हातात पडले की आपसूकच त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ, मागील पृष्ठ न्याहाळले जाते मग हळूच आतल्या पानावरच्या मजकूरांवर नजर फिरते, समर्पण पत्रिकेवर डोळे काही वेळ घोटाळतात आणि मग प्रस्तावनेची पाने पालटली जातात. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर स्थिरावते ती रंगायनाच्या काळ्या पदद्या समोर विविध मुद्रांच्या विजयाबाईना न्याहाळण्यासाठी ज्याची रचना सुभाष अवचट यांनी केली आहे. झिम्मा ही अक्षरेही एका गॉफात विअणल्या सारखी सुंदर. रंगायनाचा काळ पडदा म्हणजे अवकाशाची पोकळी आणि त्या पोकळीत जन्माला आलेले अनेक नाट्याविष्कार जे वर्षानुवर्ष रसिक प्रेक्षकान्च्या मनाला भूरळ पाडतील आणि त्यावर राज्य करतील.

मल पृष्ठावर तर विजयबाईन्च्या ह्या आत्मचरित्राचा गौरव, "एका सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा......." असेच केले आहे.

सा-या आठवणी ४४० पानांच्या ३२ प्रकरणान्मध्ये गुंफल्या आहेत.

सुरुवातीलाच त्या प्रांजळपणे सांगतात की लिखाण हा त्यांचा प्रांत नाही.

विजया बाईन्चे लहानपण गोरेगावातील आम्बेवाडीतील चाळीत तर नंतर माटुन्ग्याच्या विद्यार्थी भुवानात गेले. वडीलांचा तसेच भावाचा अकस्मात मृत्यू अशा घटना लागोपाठ घडल्या आणि त्यांच्या स्मृती लहान्या काळजावर कायमचे घर करून राहिल्या. तसा सिनेस्रुष्टीशी निगडीत शोभना समर्थ, नलिनी जयवंत आणि नूतन त्यांच्या नात्यातल्याच त्यामुळे त्यांच्या आईला. सतत धास्ती असायची की हिलाही सिनेमात जायची इच्छा होईल पण त्या राष्ट्रसेवा दलात भरती झाल्या आणि खादी, सेवादलाचे विचार , महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, साने गुरुजी जवाहरलाल नेहरू यानी त्या भारावून गेल्या.

पुढे १९८४ मध्ये मेट्रीक झाल्यावर विल्सन कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर "मराठी वाड्मय" मंडाळाच्या कार्यकारी समितीत समावेश आणि तिथूनच कॉलेजच्या वार्षिक संमेलांनात नाटकात सहभागी झाल्या आणि लग्नाची बेडी मधील 'यामिनी' साकारली आणि त्यांच्या नाट्यप्रवासाला इथूनच सुरूवात झाली ती आजगायत सुरुच आहे. एम ए ला असताना शीनोयशी ओळख झाली आणि अल्काझी सारखा नाट्यगुरू लाभला ज्यांच्या कडून त्यानी अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले.

साहित्या संघातल्या नाटकात कामे करायला सुरूवात केली . पहिलेवहीले नाटक "झुंजारराव" आणि 'कमळजेची' भूमिका एक नवे वळण देऊन गेली. तिथेच वसंत ठेन्गडी, राजा परांजपे,के. नारायण, कुसुम देशपाडे आणि दुर्गा खोटे. नाटकात भूमिका आणि दिग्दर्शन करता करता आयुष्याच्या प्रवासातही पुढचे पाऊल टाकले आणि दुर्गा खोटेच्या धाकट्या मुलाशी, हरीनशी विवाहबद्ध होऊन 'विजया जयवंत' विजया खोटे' झाल्या. लग्नानंतर जमेशेटपूरला रवाना झाल्या पण रक्तात भिनलेल्या नाट्यवेडाने तिथेही नाट्यप्रयोग केले. मुम्बईत परत आगमन केले आणि 'रंगायन' चा जन्म झाला.

रंगायन आणि विजयाबाई हा मेळ आणि त्यातून जन्माला आलेली प्रायोगिक नाटके एक वेगळाच पैलू घेऊन रंगमंचावर अवतरली. याच रंगायानाने विजय तेन्डुलकर आणि महेश एलकुंचवार या सारख्या नाटककारांना एक नवी ओळख दिली.

सगळे सुरळीत चालू असताना अचानक हिरेनचा मृत्यू आणि दोन लहानग्या मुलांची जबाबदारी बरोबरच रंगायनाचीही जबाबदारी यामध्ये गोन्धळून गेल्या तरीही नाटकानेच ह्या एकाकी पणाला सोबत दिली आणि 'विजया खोटे' 'विजया मेहता' झाल्या. त्यानंतर लंडनला स्थलान्नतर केले आणि तिथेच अनेक संस्थानमधून तिथल्या रंगभूमीची ओळख जवळून करून घेतली. इकडे एक नवीन प्रवाह गवसात होता तर भारतात रंगायनाला ग्रहण लागले. जेव्हा त्या परत भारतात आल्या तोपर्यन्त बरेच पाणी पुलाखालून गेले होते आणि लवकरच 'रंगायन' आपला आगळा वेगळा ठसा लोकांच्या मनावर ठेऊन रंगमंचावर कायमचा पडदा टाकून गेली. यापुढचा प्रवास व्यावसायिक नाट्याविश्कारातुन होत राहिला आणि अनेक नवे कलाकार आणि नवी नाटके जन्माला आली. त्यांच्यात असलेला प्रायोगिक नाट्य दिग्दर्शक कधीच स्वस्थ बसू शकला नाही, त्यानी एकापेक्ष एक सरस नाटके, भूमिका ह्या रंगमंचावर साकाराल्या विशेष उल्लेखनीय , दुर्गा, सुंदर मी होणार मधील बेबीराजे, मादी मधील नायिका, अजगर आणि गंधर्व मधील वेश्या,संध्या छाया मधील नानी, हमिदाबाईची कोठीमधील हमिदाबाई आणि वाडाचिरेबन्दीमधील आई. विजया बाईनी अनेक कलाकाराना ह्या नाट्य स्रुष्टीत एक नवी ओळख नवे अस्तित्व दिले दिले जसे भक्ती बर्वे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी आणि नाना पाटेकर. विजया बाईन्चे नाट्य विश्व मराठी पुरतेच संकुचित न रहाता ते हिंदी, जर्मन आणि ईंग्लिश मधेही त्यानी ते विस्तारीत केले.

नाट्यातून त्यानी शाकुन्तल, हवेली बुलंद थी,वाडा चिरेबंदी आणि हमिदाबाईची कोठी यांच्या टेलिफील्म्स केल्या तसेच लाइफ लाईन ही स्मरणीय दूरदर्शन मालिका.

ह्या पुस्तकाबद्दल लिहायचे म्हन्टले तर प्रत्येक अनुभव हा कागदावर जिवंत करणे अशक्यप्राय आहे. ते अनुभवायचे असेल तर नाट्य वेड्या माणसाने नाटकाच्या जन्माची,सृजनाची ही गाथा जरूर वाचावीच. शेवटी मनात विजया बाईन्चे शब्द रुळतात, " नाट्यस्रुष्टीत 'वर्तमान' काळ असतो. प्रत्येक प्रयोग अन् त्यातले प्रसंग, संवाद प्रेक्षकान्च्या साहाय्यान वर्तमानकाळातच घडत असतात. आज आणि आता. चित्रफितीत असतो केवळ 'भूत' काळ. झाल ते होऊन गेले. प्रेक्षक असोत अथवा नसोत चित्रफीत पडद्यावर, टीव्हीवर सुरुच राहाणार. नाटक प्रत्यक्षात घडते अन् संपते. पुन: पुन: घडते अन् पुन: पुन्हा संपते. नाटक घडते तो क्षण म्हणुनच बरेचदा अधिक सत्यस्पर्शी बनू शकतो.



मुक्ता पाठक शर्मा









Wednesday, May 9, 2012

माती आणि माणस..... अरुणा ढेरे


माती आणि माणस
अरुणा ढेरे

पुस्तकाच्या नावावरूनच त्याचा बोध होतो. जशी माती तशी माणस.
माती पाहिला गेले तर स्थुलरुपी सगळीकडे एकच आहे. पण तिचा रंग, तिचा पोत, तिची पाणी धारण करण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात जेव्हा तिच्यातून उगवायच असत.
परमेश्वरानेही सगळ्याना एकाच मातीतून उगवल पण प्रत्येकाची पोट हा निराळाच. अशाच निराळ्या आणि विरळ्या महान लोकांचे अनुभव ह्या छोट्याश्या पुस्तिकेत आहेत. अगदी अवघ्या एक दीड पानांचे हे अनुभव अयुष्यभराची शिदोरी देऊन जातात. एक जरी अंगिकारता आला तरी ह्या जन्माचे भाग्य.

गाव झुला



काही पुस्तके अशी असतात की ती वेड लावतात, पलटणा-या पानाबरोबर आपलेही विचारचक्र फिरत रहाते."गाव झुला" हे अशा पुस्तकापैकीच एक आहे. ४३ लघु ललीतांना सांधून बनणारा एक दीर्घ ललित.

पुस्तकाचे मुखपृष्ठ , मातीवर उपडी पडलेली भिक्षेची खापरी आणि काठी जणू निर्मोहाचे प्रतीकच ! मलपृष्ठावरील म.. देशपांड्यांची कविता ह्या पुस्तकाचे जणू सारच !!

एका बैराग्याचा प्रवास, जो शोधाला निघाला आहे. कोणाच्या ? कशाला? आणि का ? अशांसारखे अनेक प्रश्नाचे गाठोडे घेउन. आईने आळवलेली गाणी स्मरणी ठेवून, वळण वाटान्वर पुढेच जायचा ध्यास घेऊन चालतोय.

अनेक प्रश्न सदोदित मनात रुंजी घालतात, पावले थबकतात, मागे वळण्याची इच्छा होते. शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं. हे गुरुचे शब्द  त्याना वंद्य मानून गुरूची आज्ञा न मोडता पुढच्या अविरत प्रवासाला निघतो. त्याच्या प्रवासाबरोबर आपणही हा नवखा प्रवास करतो. त्याच्या प्रश्नांत आपणही गुंततो, तो गुंता आपलाच बनतो. त्याच्या शोधाबारोबर आपण आपलाही शोध घेऊ लागतो.

पुस्तकाची लेखणी खिळवून ठेवणारी आहे.एकदा हातात पडल्यावर ,एकादमात वाचून टाकण्यासारखे हे पुस्तक नक्कीच नाही आहे. हे मुळी पुस्तकच नाही आहे - हे एक "चिंतन" आहे. जे परत परत होत रहाते. विचारांचे मंथन करत रहाते.

भाषा साधी आहे, कधी सरळ तर कधी वळणा वळणाची, पण मनापर्यंत पोहचणारी. त्यातले विचार मनात कोरून ठेवणारी. साधी साधी रूपके , ओळी परत परत वाचायला भाग पाडतात , जसे " मूळ बुंध्याशी पडलेली सावली धरून झाडं स्तब्ध उभं होत . किंवा , "आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’

या प्रवासात मोहाला थारा नाही. त्यावर मात करायला तो निघाला आहे पण कशी कार्याची हे त्याला अनुभवातून आत्मसाद करायचे आहे. म्हणूनच ,"वाटेत मन लावायचं नाही अन वळणापाशी अडखळायचे नाही " अशी गुरुची आज्ञामानून अविरत प्रवास सुरू ठेवतो.

प्रश्नाना घाबरले नाही तर त्यांची उत्तरेही आपसूकच मिळतात ह्याची त्याला अनुभूति प्रवासात होते. म्हणूनच लेखक सहजगत्या लिहून जातो, "तो कधी कुठे अडखळला नाही. अनेक गावं , राने वने पार करणा-या प्रवाशाच्या पावलांनी वाटा घडू लागल्या . घनदाट जंगलातही स्वयंभू वाटा असतात . जाणत्या पावलांनाच त्या सापडतात .त्यासाठी पावले मात्र तयार हवीत. गवताचं पातंही दुखावलं तर हळहळणारी अन काट्यांनी दुखावलं तरीही ओरड न करणारी पावलं असली की जंगलातल्या वाटा सापडतात".

दु:खदायी घटना ह्या क्लेशदायी असतातच तरी सुखदायक घटना ह्या मोहात गुंतवून ठेवून अधिक वेदनादायक ठरतात. ओरखडे जसे दुखावतात; मखमली स्पर्श देखील वेदानादायीच असतो. सवय लावतो आणि बांधून ठेवतो . दु:खाचे काढ आणि सुखाची गुंगी दोन्हीही सवयीचा भाग बनतात . घर करतात. त्याच्यासाठी घरे तुटतात देखील . मग घर घडवायचाच कशाला ? कशाला घालायचा हा घाट? हा प्रश्न त्याच्या मनात डोकावतो पण त्याच्याशीही तो सलगी करत नाही आणि मार्गस्थ होतो . त्याला कशाचाच मोह पडत नाही , अगदी भूकेचाही नाही . कोणी जोंधळा देऊ केला तर तो पाखराना देऊन निमूट आपली वाट चालत रहातो . त्या जोंधळ्याचे ओझ त्याला पेलवत नाही आणि ओझ्यामागे चाल राहाणे हे त्याचे प्राक्तन नाही .म्हणूनच ह्या बैराग्याचे सारे काही अप्रूप आहे तो आपला सदोदित चालत रहातो .

या पुस्तकात जागोजागी पुराणातल्या कथा रूपकात्मक पेरल्या आहेत. सरळ सरळ व्यक्तीचा वा पात्राचा उल्लेख ना करता अपरोक्ष रीत्या मूळ उद्देश वाचकापर्यंत पोहचवण्याची धडपड दिसून येते.

बैराग्याच्या कल्पनाच निराळ्या , कधी तो वेड्यासारखा धावत सुटतो . का तर? मोहापासून दूर जाण्यासाठी.
तर कधी वाटेत पडणारे गाव निर्मल, लख्ख करतो. कारण गाव हा त्याचा जिव्हाळ्याचा. गाव जर स्वच्छ तर मनही स्वच्छ यावर त्याचा गाढ विश्वास.

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्यांचे भयानक जीवघेणे प्रकार तो उघड्या डोळ्यांनी पहातो आणि त्याची खात्री पटते 'जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’

सुरुवातीला गुरुभेट घेऊन निघालेला बैरागी , अनेक वेळा गुरूला अप्रत्यक्षरीत्या अनुभवतो , कधी त्याच्याच विचारातून तर कधी नकळत भेटलेल्या वाटसरूत, नदी नाल्या ओढ्यातून तर कधी सरपटणा-या वा उडणा-या जीवातून.

काही ठिकाणी लेखाकाचा पूर्वग्रह त्याच्या लिखाणावर मात करत आहे हे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे वाचताना काहीवेळा निराशाही पदरी पडते.

लेखक विदर्भातील असल्यामुळे वैदर्भीय भाषेची पखरण करून अनेक नव्या शब्दांची ओळख होते.

हे पुस्तक एक दीर्घ ललित बंध असल्यामुळे तसेच लोकप्रभा सापताहीकातून हे लेख पूर्वप्रसिद्ध झाल्यामुळे
काही ठिकाणी तोच तोच पणा आला आहे , तरी तो कन्टाळवाणा वाटत नाही तर तो पुढच्या प्रवासाला पूरक असाच ठरतो.

गावझुला [दीर्घ ललितबंध]लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.




मुक्ता पाठक शर्मा

Thursday, April 19, 2012

अज्ञात झ-यावर रात्री.....अरुणा ढेरे

अज्ञात झ-यावर रात्री हे पुस्तक दुस-यांदा वाचले.
पहिले कॉलेज मध्ये असतांना वाचले होते आणि आता परत.
जेव्हा एखादी कलाकृती आपण दुस-यांदा अनुभवतो तेव्हा तिची अनुभूती ही पहिल्या पेक्षा निश्चितच वेगळी असते. ह्या पुस्तकाच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होते.
हे पुस्तक म्हणजे १५ पूर्वप्रसिद्ध लघु कथांचा संग्रह.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अरुणा ढेरे प्रत्येक कथेची पार्श्वभूमी सांगतात. अरुणा ढेरे ह्या आपल्या प्रत्येक लिखाणातून स्त्री ह्या भूमीकेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहातात. त्यामुळेच कदाचित त्यांचे लिखाण मला कायम आवडते. महाभारतातील स्त्री पात्रांबद्दल असलेली त्यांची ओढ ह्या पुस्तकातील कथांमध्येही दिसून येते. त्याच बरोबर संत स्त्रियांच्या आत्मशोधाचा मागोवा घेणा-या काही कथा समर्थपणे उभ्या रहातात आपल्यासमोर. तर काही लोककथा नव्याने जन्म घेतात.
मनोगतात त्यांनी सहजतेने सांगितले आहे,"एका परीने या संग्रहातल्या कथांमधून नव्या आणि जुन्या स्त्रीचे जगणे मी शोधते आहे. माझ्या जवळची , अनुभव , आणि समाज यांची पुंजी तशी फार मोठी नाही. पण बाल आहे ते तिचेच आहे. वाटते की, अतिदीर्घ आणि अतिविस्तृत असा काल आपल्यापुढे पसरला आहे.आजचे आपण - माणूस म्हणून, बाई म्हणून या काळाच्या हातून काही स्वीकारतो, काही नाकारतो. काही पेटत हाताने शोषतो, काही निर्धाराने गिळून टाकतो. या कथा म्हणजे त्या स्वीकार - नकाराच्या, 
शोषण्या- गिळण्याच्या  आहेत, असे म्हटले तरी चालेल."

पहिली कथा "पूजा" , या कथेची चौकट तंजावरच्या प्रसिद्ध बृहदिश्वर मंदिराशी निगडीत आहे. या मंदिराच्या कळसाची तळी गावातल्या एका वृद्धेच्या  दारातल्या शिलेची घडवलेली आहे. खुद्द बृहदिश्वारानेच नगराधिपती  राजाला स्वप्न दृष्टांताने त्याबाबतची आपली पसंती कळवल्याची स्थळ माहात्म्य कथा या कथेचा आधार आहे.
जयाम्माची सून पद्मा,  नवरा विश्वनाथ १२ वर्षापासून नाहीसा झालेला , कुठे गेला , का गेला याची कोणालाही खबरबात नाही. पद्मा नेमाने आपले कर्तव्य पार करत  एक सवाष्ण असूनही सन्यस्त जीवन जगत आलेली. त्या सन्यस्त जीवनाचे तेज तिच्या चेह-यावर दाटलेले. मनापासून शिवाच्या पूजेत रमून जाणारी जयाम्माची लाडकी सून.
घराच्या दारातली शिला बृहदिश्वाराच्या मंदिराच्या कळसाच्या तळी साठी योग्य ठरल्यापासून जयाम्माचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर शिवाने आपली प्रार्थना ऐकली आणि आपली पूजा सार्थकी लागली असेच तिला मनापासून वाटत होते. शेवटी कोणाची पूजा फळते हे इतक्या सहजतेने कथेत गोवले गेले आहे.

दुसरी कथा : अज्ञात झा-यावर रात्री.  रजू आणि रमा यांची आपली एकेकटीची व्यथा, एकमेकात गुंतून ही कथा समोर येते. १० वर्षानी एकमेकीसमोर समोर येणा-या  मैत्रिणी , वेगवेगळ्या मार्गावर आगेकूच झालेल्या, शेवटी एका वळणावर एकमेकीना भेटलेल्या. इतक्या दूर असूनही दोघीन्च्याही अंतरंगात समजुतीचे झरे झुळकत असणे ही एका अतूट बंधनाची / मैत्रीची ग्वाही देणारे. आणि ग्रेसच्या ओळीच्या गर्भित ओळींचा ओलावा जाणणारे  हे कथानक.कथा वाचल्यावाराही  ओळी मनात गाज देत रहातात 
" मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झा-यावर रात्री मज ऐकू येतो पावा ...."

तिसरी कथा " की आपुला ठावो न सांडिता "

की आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटिता ।
ऐसा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ।।

शाब्दिक अर्थाच्या  मागे धावताना अर्थ कधीच गवसत नाही. काही अर्थ हे अनुभावान्च्या अनुभूतीतूनच येतात. ह्या कथेचा परीघ असाचा विस्तृत आहे. क्षणभर ह्या कथेचे पात्र अजिता ह्या परीघाची परिसीमा जाणून न घेता आपल्याभोवती परीघाची मर्यादा  रेषा आखते तर जेव्हा सगळ्या गोष्टीन्मागचा अर्थ गवसू लागतो तेव्हा प्रत्येक नातातल्या  परिवर्तनाची उकल तिला होते.ह्या मार्गात वाटाड्या बनतात ते नाना आजोबा.

उमज -- चौथी कथा,

परिस्थिती सगळ काही शिकवते. पण सगळ्या गोष्टी उमजेपर्यंत एका आधाराची आवश्यकता ही लागते.  प्रत्येक झाड हे स्वयंभू वाढत नाही. एका विशिष्ट उंची पर्यंत यायला एखाद्या  झाडाला  आधार लागतो. 
अशीच काही अवस्था सांगणारी ही कथा. जयंत - बिंदा , आणि जयंत - गिरीजा यांच्या नात्याचा ठाव घेते.
जयंत हा आधार आहे तर बिंदा एक स्वयंभू तर गिरीजा आधार शोधणारी. एका वळणावर तिच्या ह्या अवलंबून असण्याच ओझ जयंताला वाटते. त्या ओझ्याला नाकारायाचीही हिम्मत म्हणण्यापेक्षा ,त्याला गिरिजाला दुखवायचे नाही. गिरिजाला जेव्हा स्व:ताच्या कार्यक्षमतेची जाणीव होते तेव्हा तीच स्व:ता हे ओझ हलके करते. 

"धुकं "
पिढीच अंतर , आजी नाती मधल्या नात्याचा सुंदर गोफ.
काळ बदलतो , घड्याळाचे काटे पुढे सरकतात , पिढी मधील अंतरे वाढतात. तरी स्वभावाची चाकोरी कधी बदलत नाही. कपडे बदलावे तसे बाह्य जग बदलते पण अंतरंग , मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म कधीच बदलत नाही.
या कथेत आजी तिच्या नातीला , अर्थात मुक्ता सहजपणे बोलून जाते ," पन्नास वर्ष उशिरा कोय लावली तरी आंबा तो आंबाच उगवायचा  मुक्ते ! "
"जग पुढे न मागे नाही. पन्नास वेळा बदला माती, पण झाड भुईवरच असत ना अन भुईचा बदल म्हणशील तर झाड तेवढा मानून घेत की नाही ? माणसाचाही तसंच असत बाई ! "
आजी   दुसरेपणाची, सासूची नावडती, सासूचे  अनेक अत्याचार सोसलेली तरी शांत . हे सोसण्याच बळ आल कुठून असा कायम प्रश्न पडलेला. आपण जी सारी शक्ती भांडणात वाया घालवतो तीच शक्ती आजीने साठवून ठेवली की काय शांत राहून ?

माती नांगरली , कडकडत उन अन बिलगणा-या पावसाचा प्रेमळ सहवासात तिला मिळाला की तिच्यात बीज चांगल रुजत. तसंच ह्या कथेतल्या आजीच. आजोबांचा प्रेमळ सहवास तिला सा-या दु:स्वासांवर मात करून जायचं बळ देतो. छळणारी सासूही शेवटी तिच्या मायेच्या सावलीत पश्चातापाने जळत - निवत जाते.

तसं पाहिलं गेल तर प्रत्येकाच्याच जीवनात परिस्थितीच धुकं दाटत, पण त्यातून सहारा देणारा वा आपुलकीचा , मायेचा जवळ करणारा स्पर्श सर्व काही सुकर, सुखकर करतो.

कथेच्या शेवटी आजी म्हणते , " माणसाचं आयुष्य असत तरी केवढ ?  एक ओवी गावी अन पैल पालखी जावी ."

सहावी कथा नात.

नंदिता , सुबोध आणि देवकी यांची. प्रेमाचा त्रिकोण.त्यातून उद्भवणारी मानसिक आंदोलने. याचाच घेतलेला  मागोवा. सरळ अपेक्षित वळणाने ही कथा संपते.

"आपण एकमेकांना "

ही कथा मनात घर करून रहाते, लग्न म्हणजे नक्की काय ? दोघांच एकमेकासोबत असण म्हणेजे काय? शरीरापलीकडे  जाऊन एकमेकांची गरज एकमेकांना असते आणि ती गरज शाररीक गरजेपेक्षाही मोठी असते. भावना, मन हे उमजल एकमेकांच तर सगळ आयुष्य सुकर बनत. छोटी मोठी वादळे आली तरी ती निभावून जातात. पण नात्यात हा ओलावाच नसेल तर ते शेवटी विस्कटत आणि तुटत. हेच सांगणारी ही कथा अवि आणि शोभा यांच्या नात्यातली परिणीती.त्याच बरोबर आबा , माई आणि सुमित्राचीही !

कधीतरीची गोष्ट.

"भुललासी   वरलीया रंगा ' असेच काही ह्या कथेतून सुचवायचे आहे.
तेजा , हट्टाने प्रेमविवाह केलेला , आता तिला तिचाच संसार निरस वाटतोय मन दुसरीकडे धावातय  आपण करतोय ते बरोबर आहे की नाही ह्याचही भान नाही , काय कराव काय करतोय ह्या शंकांच्या जंजाळात अडकलेली . दुसरीकडे रेणुका शांत सरळ वाट बघत थांबलेली. 



पानझड......ना. धो. महानोर

Thursday, March 22, 2012

Ganapati atharvshirsh

झेन गार्डन ----मिलिंद बोकील


झेन गार्डन या   मिलिंदा बोकिलांच्या कथा संग्रहात त्यांच्या पूर्व प्रसिद्ध झालेल्या ८ कथांचा  समावेश आहे.
पहिलीच कथा "यंत्र" नावाची आहे .एका महाकाय यंत्राची  कथा म्हणण्यापेक्षा त्या यंत्राशी   साधलेला हा एक संवाद आहे.
यंत्र दुरुस्ती करणारा 'हरिहर" आणि त्याच्या प्रयत्नांचा अंत पहाणारे यंत्र.

भाषा ओघवती आहे त्यामुळे वाचतांना मजा येते आणि पुढे काय होईल याची उत्सुकता लागून रहाते.
निर्जीव कारखान्याला वा यंत्राला ही जीव आहे असेच भाषेतून प्रतीत होते .
कारखान्याच्या अवाढव्य पणा बद्दल लिहून जातात .."महाकाय पंखे.अंतराळातून खाली उतरलेल्या असंख्य  ट्युबलाईट्स. पण त्यांचा पांढरा प्रकाश  लोखंडी पोकळीने शोषून घेतल्यासारखा .आणि सगळ्या हवेला एक लालसर गरम लोखंडी वास."
 प्रचंड महाकाय यंत्राचे  वर्णन करतांना त्याच्या भव्यतेची आणि ते  बिघडल्यामुळे शांत झाल्याची जाणीव शब्दातून करून देतात..."पाय पोटाशी घेऊन शांत पहुडलेले.भव्य निरागस..."

हरिहरचा सुरुवातीचा उत्साह , क्लिष्ट यंत्राचे दोष चुटकी सरशी सोडवण्याची त्याची हातोटी आणि त्यामुळे नकळत आलेला सार्थ गर्व /अभिमान हळू हळू कसा निरसत जातो. सुरुवातील यंत्राशी जणू युद्ध पुकाराल्यागतचा त्याचा अविर्भाव अगदी यंत्राला नाठाळ, खोडील,अडाणतट्टू आणि नंतर प्रेमाने हळूवार त्याला आंजारत गोंजारत त्याच्याशी केलेला संवाद एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात.

दुसरी कथा "अधिष्ठान".
कथेच्या नावावरून कथेचा गाभा प्रतीत होतो. गायत्री आणि विश्वनाथाच्या नात्याचे अधिष्ठान, त्यांनी पत्करलेल्या मार्गाचे अधिष्ठान की पत्करलेल्या मार्गाला पूर्णत्वाला नेण्यासाठी केलेले अधिष्ठान ! असे अनेक विचार मनात येत रहातात ही कथा वाचतांना.
स्थित्यंतर हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी काही वळणे परत लागतात. काळ पुढे गेलेला असतो, त्याच बरोबर त्या वळण वाटांवर अनेक बदल  घडून आलेले असतात. असे असले तरी मूळ प्रवृत्ती बदलत नाही. नात्यामधला ओलावा ते नातं  टिकवून ठेवते. अपेक्षांच्या ओझ्यात नातं दबून न जाता ते अपेक्षारहित प्रेमात ते फुलून रहात.

तिसरी कथा "निरोप"
ही कथा एक "स्थिती" आहे. जी प्रत्येकाने अनुभवली असेल अशी.
कधी न पाहिलेली माणसे  जिव्हाळा लावतात. आणि नकळत त्यांच्या  बद्दल आपुलकी वाटू लागते.
रामाकांताचेही असेच काही होते , जगण्या,राघो,कमल्या,आत्याबाई आणि अंजी ह्या सगळ्यांच्यात तो रमून जातो. अबोल नात्याचा  धागा त्याला आठवणींचा साठा देतो.

चौथी कथा ,"आभास"
बिरवाडीत रघुनाथ ,सिमतेरेझीया सिस्टरच्या मिशन मध्ये येतो, तेव्हा त्यांच्या बद्दल निर्माण झालेले कुतूहल, घरदार सोडून इतक्या दूरच्या देशात आणि तेही एका विराण गावात  मिशनच्या कार्याला वाहून दिलेला जन्म ह्या सगळ्या गोष्टी उकलू लागतात. ही कथा वाचताना कुठेही अवाजवी शब्दांचे अवडंबर नाही. संथ पुढे जात एका बिंदूवर येऊन एक आभास देऊन जाते.

पाचवी कथा ,"आरंभ"
World organization of anthropologist चा एक शास्त्रद्न्य कझान बेटावर जायला निघतो आपल्या सहका-याच्या, Walter च्या शोधात. तिथली आदिवासी जमात सगळ्या जगापासून अनभिज्ञ आहे. जगात महाविनाशी अनुयुद्ध सुरु झाले आहे. मानव जातीचा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने केलेला प्रयास ह्या कथेत वाचायला मिळतो. Walter  त्याच्या डायरीतील टिपणे,त्याचा हत्या करून लटकवलेला देह,  ह्या सार्या गोष्टी पुढे येणा-या घटनांची नांदी !
शेवटी जमेल तसे शिकान पर्वताच्या दगडात जे जमेल ते कोरून, शेवटच्या श्वासाबरोबर "आरंभ" होणारा एका नव्या युगाचा प्रवास ! 

सहावी कथा "साथीन"
प्रभाबरोबर एका राजस्थान मधल्या छोट्या गावात शिबिराला आलेली रेवती जेव्हा गावातील स्त्रियांचे धाडस, त्यांनी एकजुटीने केलेला अन्यायाला विरोध पाहून अचंबित होते आणि आपसूकच मनात दाटलेले मळभ बरसवून टाकून निरभ्र बनून परतते.
चंपा,मनकी,मितल, हिराबाई या सगळ्यांमध्ये तिला आपली मैत्रीण ,साथीन मिळते.

सातवी कथा, "पायऱ्या"
यशाच्या पाय-या चढून गेल्यावरही जमिनीवर पाय असणारा श्रीपाद, आणि जेव्हा तो कामगार  चळवळीचा भाग होता तेव्हा त्याच्या बरोबर असणा-या जया,अशोक यांच्या मधल्या मैत्रीची कथा. माणूस कधी पाया-या चढतो तर कधी पाय-या उतरतो....लाक्षणिक अर्थाने नव्हे तर कर्माने सुंदर रीत्या रेखाटले आहे.

आठवी कथा "झेन गार्डन"
जपान मध्ये झेन गार्डन ला भेट देणारी कल्याणी आणि तिला तिथे घेऊन जाणारा निरंजन यांच्यातला संवाद एका वेगळ्या अनुभूतीचे दर्शन देऊन जातात.



Friday, September 2, 2011

The Illustrated Longitude..the true story of a lone genius who solved the greatest scientific problem of his time.....Dave Sobel.

पुस्तकाचे नाव तसे बोजड वाटत.पण भाषा शैली साधी आहे एकदा का वाचायला सुरुवात केली की पुस्तकाच्या रंगात रंगून जातो आणि सहजगत्या शाळेत शिकलेल्या भूगोलाची आणि इतिहासाची आठवण होते.अर्थात हे पुस्तक शालेय ज्ञानाच्या कक्षा रुंदावते. पहिले प्रकरण
अक्षांश आणि रेखांश याचे गणित समजावते आणि त्याबरोबरच हँरिसन च्या शोधाच्या निकडीची जाणीव करून देते .तसे पहायला गेले तर अक्षांश आणि रेखांश ह्या काल्पनिक रेषा,अढळ राहाणा-या ....The latitude and longitude lines govern with more authority, they stay fixed as the world changes its configuration underneath them—with continents adrift across a widening sea, and national boundaries repeatedly redrawn by war or peace.
त्यातही रेखांश अक्षांशापेक्षा जास्तच अढळ त्याच्यावर कोणाची मक्तेदारी नाही म्हणूनच कदाचित टोलेमीने स्व:ताला हवे तशी prime meridian आखली .आणि त्यानंतर  तिची बदलत  गेलेली  जागा जागतिक राजकारणाचा प्रभाव कसा असतो हेच कदाचित सुचवत असेल यात शंकाच नाही....Ptolemy was free, however, to lay his prime meridian, the zero-degree longitude line, wherever he liked. He chose to run it through the Fortunate Islands (now called the Canary Islands) off the northwest coast of Africa. Later mapmakers moved the prime meridian to the Azores and to the Cape Verde Islands, as well as to Rome,Copenhagen, Jerusalem, St. Petersburg, Pisa, Pans, and Philadelphia, among other places, before it settled down at last in London.
अक्षांश रेखांश  ह्याचा गणिती खेळ सारा पृथ्वीच्या परिघा आणि दिवसा वर अवलंबून असणारा ....२४ तासात पृथ्वी ३६० अंश फिरते अर्थात १ तासात १५ अंश. तर एक अंश पुढे जाण्यासाठी पृथ्वीला ४ मिनिट लागतात .अगदी सरळ साध्या भाषेत लगतच्या दोन अक्षांशा मधील अंतर  हे चार मिनिटांचे.पण हे गणित फक्त विषुववृत्तावरच लागू होते. कारण ..At the Equator, where the girth of the Earth is greatest, fifteen degrees stretch fully one thousand miles. North or south of that line, however, the mileage value of each degree decreases. One degree of longitude equals four minutes of time the world over, but in terms of distance, one
degree shrinks from sixty-eight miles at the Equator to virtually nothing at the poles.
इथेच  सगळा  खेळ संपत नाही तर खरी मजा इथूनच सुरु होते.१७ व्या शतका पर्यंत  वापरली जाणारी घड्याळे 
समुद्र प्रवासात अनेक कारणांमुळे निरुपयोगी ठरली....On the deck of a rolling ship, such clocks would slow down, or speed up, or stop running altogether.Normal changes in temperature encountered en route from a cold country of origin to a tropical trade zone thinned or thickened a clock's lubricating oil and made its
मेटल parts expand or contract with equally disastrous results. A rise or fall in barometric pressure, or the subtle variations in the Earth's gravity from one latitude to another,could also cause a clock to gain or lose time......४ शतके ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अनेकांनी कसोशीने प्रयत्न केला प्रामुख्याने युरोपात .गॅलिलिओ कॅसिनी,ह्युजेन न्यूटन ,हॅली ह्या सगळ्यानी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण कोणालाही यात यश मिळाले नाही.आणि या शोधात प्राणही गमवावे लागले.
Most crowned heads of state eventually played a part in the longitude story, notably George III and Louis XIV.Seafaring men such as Captain William Bligh of the Bounty and the great circumnavigator Captain James Cook, who made three long voyages of exploration and experimentation before his violent death in Hawaii,
सतराव्या शतकात तर युरोप खंडातील अनेक देशांच्या शासनकर्त्यांनी मोठ - मोठ्या बक्षिसांचे अमिषही दाखविले.याही पेक्षा वरचढ ब्रिटीश पर्लीयामेनटने Longitude Act of १७१४ अस्तित्वात आणला आणि जो कोणी 
"Practicable and Useful" means of determining longitude. बनवेल त्याला राजसंपत्ती इतकीक सम्पत्ती देण्याचे अमिषही दाखविले. घड्याळे बनविणारा साध्या राहणीया पण असाधारण बुद्धीमत्तेच्या जॉन हॅरिसनने  अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखविले. मात्र त्याच्या कामाचे खरे श्रेय मिळण्या साठी मात्र त्याला तब्बल ४० वर्ष वाट पाहावीलागली.
ह्या पुस्तकाच्या पुढील प्रकरणात त्याच्या सा-या शोधाप्रक्रीयेचा आढावा घेतला आहे.....दुस-या प्रकरणाकडे 
वळतांना  लेखिकेने अतिशय मार्मिक शब्दांत लिहिले आहे....
All these threads, and more, entwine in the lines of longitude. To unravel them now—to retrace their story in an age when a network of orbiting satellites can nail down a ship's position within a few feet in just a moment or two—is to see the globe anew.
"Imaginary lines" नावाचे पहिले प्रकरण इथेच संपते आणि "The Sea Before Time" हे दुसरे प्रकरण सुरु होते.
ह्यात १४व्या ते १७व्या शतका पर्यंत झालेल्या समुद्र सफरींचा आढावा घेतला आहे.ह्या ह्या सफरीं  मागचा उद्देश , त्यांचे ध्येय , त्यात आलेले यश अपयश ह्या साऱ्यांचा परमर्श घेतला आहे़ उदाहरणांचे दाखलेली आहेत दिलेले. १७व्याशतकापर्यंत झालेल्या साऱ्या सफरी ह्या काही परंपरागत चालत आलेल्या ठोकताळ्यावर करण्यात आल्या तर एखाद्या धैर्यशाली समुद्रविराने एखादा नविनच प्रयोग केलेला आढळतो. आणी त्यात झालेली सपशेल हार "लॉजीट्युड" मोजण्याणाऱ्या यंत्राची गजर कशी निकडीचीहोती  हे सांगते.फेसाळणाऱ्या समुद्रात जहाज भरकटून जाणे वा गडद धुक्यात हरवून जाणे हे वारंवार घडून येणारे प्रसंग होते आणि त्यामुळे अनेकांना विनाकारण प्राण गमवावे लागले.कधी कप्तानाने घेतलेल्या चुकीच्य  दिशांमुळे भलत्याच मार्गाला लागून तहानेने आणि स्कर्वी सारख्यारोगांना बळी पडणारे सैनिक हे एक साधारण चित्र झाले होते. अक्षांशाच्या निकडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे बरेचदा समुद्र प्रवास हा माहित असलेल्या मार्गांवरून केला जाई आणि बरीच मालवाहू जहाजे चाचेगीरीलाबळी पडत.. १५९७ मध्ये ६-७ समुद्री चाचांनी भरतहून परतत असलेल्या "मॅड्री डी डीउस" ह्या भल्या मोठ्यापोर्तुगाल च्या मालवहू जहाजावर हमला करून त्यावर ताबा मिळवला आणि कित्येक टन मसाल्याचे पदार्थ त्यांच्या हाती लागले.अक्षांशाच्या निकडीकडे लक्ष वेधण्याला करणीभूत ठरलेली घटना १७०७ साली घडली .फ्रेंचांवर विजय मिळवून जिब्राल्टरून जेव्हा ऍडमिरल क्लॉवडस्ले शॉवेल इंग्लंडला परतत असतांना धुक्याने त्यांचा  मार्ग चूकविला आणि २००० पेक्षाअधिक सैनिकांना जलसमाधी मिळाली.अशारितीने १७१४ साली "अक्षांश कायदा" इंग्लंडने जाहिर करून जो कोणी अक्षांश मोजणायाची योग्य प्रणाली समुद्रप्रवासाकरिता शोधून काढेलत्याला २०,००० युरोचे बक्षीस जाहिरही करण्यात आले.






क्रमश:....

Tuesday, September 28, 2010

कृष्ण किनारा....अरुणा ढेरे

नुकतेच दूर्गाबाई भागवतांचे "व्यासपर्व" वाचनात आल्यानंतर अरुणा ढेरेंचे "कृष्ण किनारा" वाचायला मिळाले. आणि परत महाभारताशी संबंधीत स्त्री पात्रांशी संवांद साधला गेला. कृष्ण किनारा या पुस्तकात ३ स्त्री पात्रांबाद्दल अरुणा ढेरेंनी लिहिले आहे.
त्या तिघी : राधा, कुंती आणि द्रौपदी. शतकांपूर्वीच्या कथा-काव्यातून वावरणा-या. काळाची दीर्घ, अवघड वाट चालतांना व्यक्तित्वाची लहान सहान स्फुरणही जपत आपल्या मनापर्यंत येऊन पोहचलेल्या. आपण निरखतो त्यांना. त्यांच्या भावजगताचा पैस अजमावू पाहतो.समजू पाहतो त्यांच्या स्त्रीत्वाची जातकुळी,आणि पूर्ण्पुरुष कृष्णाच्या अथांग आयुष्याचा एखादा किनाराही त्यांच्या आयुष्यातून शोधू पाहतो. त्या तिघींची समजूत मोठी.थोड्या थबकतील,वर्तमानाला देऊन टाकतील त्यांचं देणं,आणि काळाच्या दीर्घ,अवघड वाटेनं पुढे जातच राहतील.

ह्या तिघी वेगळीच जातकुळी घेउन जन्माला आलेल्या,आजन्म देण्याचेच कर्तव्य पार पाडत आलेल्या. साधारण, सामान्य स्त्रीच्या जीवनापलिकडे जाऊन गवसलेल्या असामान्याच्या ताकदीवर आयुष्य घडविणा-या.

हे पुस्तक प्रस्तावनेपासूनच मनाची पकड घेत जातं. प्राचीन साहित्याची गौरव गाथा मांडतांना निघालेले शब्द पुढे मांदून ठेवलेल्या शब्द राशींची कल्पना देतात. शब्दा शब्दातून कृष्ण किनारा आपल्याला सापडतो आणि वैचारिक रपेट सुरु होते. कधी मनाची कालवा कालव, तर कधी मनाची घालमेल, तरी त्यातून कुठेही तोल ना जाऊ देता साधलेला समतोल मनाच्या निळाईच्या अथांगतेची पूर्ण जाणिव करुन देतो.

प्रस्तावनेतच "हे का लिहिलं?" हे प्रश्नचिन्हच सा-या उत्तरांना वाट करुन देतं. सहजगत्या अरुणाढेरे सत्य सामोरे आणतात.."हे परंपरेचं जग मोठं अद्भुत आहे !कधी तत्वज्ञानाच्या अतिसुंदर चांदण्यानं झगमगतांना, तर कधी मनाविषयीच्या खोल समजुतीच्या निळाईनं वेढलेलं असताना, तर कधी उदाताच्या, सर्वकल्याणाच्या उन्हात प्रसन्न हसताना, तर कधी सुख दु:खाच्या विविध रंगांनी बहरुन येताना ते जग पाहिल की, खरोखर आपण स्तिनित होतो. पण पृष्ठभागावरच्या नवलाईखाली तळघरही आहेत अंधाराची, आणि त्यातलं एक मला थोडसं दिसलं. पुष्कळ बायका तिथे मरुन पडलेल्या मी पहिल्या, कुणाच्या गळ्याला देवत्वाचं नख लागलेलं,तर कुणी पातिव्रत्याचं विष प्यालेलं.कुणी निरागसतेचाच कलंक लागून मेलेली.तर कुणी समाज पुऋषाच्या कठोर मिठीत घुसमटून गेलेली.काही झगडल्या होत्या,तर काही ताठ मानेनं जगल्या होत्या. काही अबोल सोसणा-या होत्या. मी एकदाच ते विलक्षण दृष्य पाहिलं,पण आजवर ते विसरु शकले नाही. त्या तळघराच्या अंधारातून येणारा मृत्यूचा वास वेळी अवेळी मला अस्वस्थ करुन टाकतोच आहे. डोळे मिटले की त्या असंख्या बायकांपैकी कुणी ना कुणी मला दिसतेच आहे. कुणी देवळात देवी होऊन बसलेली.कुणी नाटक सिनेमातलं एखादं पात्र म्हणुन आलेली.....या अनुभवातून बाहेर यायचं कसं? एक उपाय म्हणून लिहावसं वातलं.त्या लिहिण्याची ही अगदी लहानशी सुरुवात आहे. फक्त तिनच तुकडॆ..."

राधा ,कुंती आणि द्रौपदी बद्दल कथारुपाने लिहिले आहे..एक एक प्रसंग जणू आपल्या समोर घडत जात आहे एखाद्या चलत चित्राप्रमाणे असेच वाटते. आधी व्यासपर्व वाचल्यामुळे, दूर्गाबाई भागवतांच्या अभ्यासात्मक लेखांचा मनावर पगडा जास्त बसल्यामुळेही,काही ठिकाणी काही बारकावे प्रभावी नाही वाटत. मूळ महाभारत आणि मांडलेल्या स्त्री पात्राच्या व्यक्तिरेखा ह्यात कधी कधी थोडी तफावतही आढळुन येते. पण एक कथानक म्हणुन असामान्य अशा पात्राच्या मनाचा गर्भ उलगडतांना त्यात एक सामान्य मनही आहे ह्याची तीव्र जाणिव होते. स्त्री जातीचा पिंड हा एक आहे आणि तो एकमेकींच्या जीवनाशी कुठे ना कुठे साधर्म्य साधतो हे जाणवु लागते.

तिनही व्यक्तिरेखा मांदतांना लेखिकेला द्रौपदीने भूरळ पाडली आहे हे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकीच्या तोंडी असलेले द्रौपदीचे उच्चारण प्रत्येक पात्राला कृष्ण किना-याबरोबर कृष्णेची झालरही देऊन जातात.

पहिला परामर्श राधेच्या जीवनाचा घेतला आहे. अनेकांप्रमाणेच इथेही राधा ही एक प्रेयसीच्याच रुपाने अवतरते.
राधा खरच प्रेमिका होती का? हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात येतो. कारण कृष्णाने गोकुळ सोडले तेव्हा तो इनमिन सात आठ वर्षाचा होता आणि राधा त्याच्यापेक्षा बरीच मोठी होती.अशा स्थितीत त्यांच्यात प्रेम संबंध होते की ते वात्सल्याने परिपूर्ण असे नाते होते?  हा प्रश्नांचा सारा डोलारा मनात घेउन "राधेला" वाचले. प्रेमिकेच्या भुमिकेतून योग्य वाटणारे असेच हे कथानक.
एक दिवस आचानक राधा द्वारकेत कृष्ण महालात येउन पोहचते आणि तो तिला सागर किनारी असलेल्या मंदिरात भेटण्याचे वचन देतो. इथुनच भूतकाळाची आणि वर्तमानाची घालमेल सुरु होते.जे सोडुन आलो कायमचे ,ज्या कडे कधी फिरुनही पाहिले नाही ते असे अचानक समोर येणे..आनंद मानावा की हळवी जखम पुन्हा ओली झाल्याच्या वेदनांत विव्हळावे अशीच काहीशी कृष्णाची स्थिती.
शब्दांतून आपण अर्थ शोधावे असेच काही ठिकाणी वाटते. कृष्ण राधेला सागर किनारी भेततो तेव्हा राधा त्याला विचारते," बासरी आणली असती, तर वाजवली असतीस रे पुन्हा !" यावर तो म्हणतो," नाही राधे. द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट.हा आवाज ऐकते आहेस ना पाण्याचा ? जोर बघ किती आहे वा-याला. इथे बासरी वाजायची नाही. आणि माझ्या जवळ आहे कुठे बासरी ! गोकुळातून निघालो तेव्हा तू ती जी हिसकावून घेतलीस,तिच्यानंतर बासरी आलीच नाही माझ्या हातात.मला वाजवायची नव्हती,म्हणून मग मिळविलीही नीही मी ती फार अट्टाहासानं"
गोकुळात मागे सारे सोडून कर्तव्यपरायण होऊन सारे जीवन जो राबला त्याला जेव्हा राधा विचारते,"तूझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला,हे तुला कधी समजल का रे नंतर." यावर कृष्ण जे उत्तर देतो ते थोडे निष्ठुर वाटते पण तितकेच तात्विकही.." तपशील नाही कळाला. म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दाम म्हणुन.त्याची जरुउर होती. खरच?".
्गोकुळातून निघाल्यावर जे घडणार होते ते माहितच ्होते तेव्हा मागाहून जे घदले त्याच्या खोलात जाऊन त्याची नव्याने काय माहिती होणार होती असे काहीसे तर म्हणायचे नाही ना?, असेच असावे बहुदा.
मी का आले ? ह्या राधेच्या प्रश्नावर जे तो बोलून जातो ते अनोखेच,ज्यातून एक वेगळा अनुभव एक वेगळी अनुभूती झाल्याची जाणिव होते.
राधेने आंतरबाह्य सारे कृष्णार्पण केले आणि तिला त्याने जीवनभर पूरुन उरेल इतके लसलसते जिवंत दु:ख दिले.ते तिने घेतले कसे?कुठे ठेवले? त्याचं काय केल? कशी जगली त्याच्याबरोबर ? एक ना अनेक प्रश्न चिन्ह....ह्या सगळ्या अनुभवांचे देणं आहे आहे..याचाच अर्थ जीवनाच्या प्रत्येक वळणावर तिची आठवण होती की तो तिलाच सर्वठायी शोधत होता? ह्याचा तपशिल पुढे येतोच.रुक्मिणी हरणात रुक्मिणीच्या धुंद चेह-यात त्याला राधा आठवते.भामेच्या रागात राधा आठवते,द्रौपदीच्या प्रश्नांत त्याला राधा आठवते...पदोपदी जे मागे सोडून आला आहे त्याचा साक्षात्कार त्याला पुढ्यात होत राहतो.
जेव्हा तो तिला क्षमा मागतो, मी चुकलो मला क्षमा कर म्हणतो .यावर तिचे उत्तर जणु ती त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाची साक्ष असल्यागतच वाटते. ती म्हणते," मी कोण तुला क्षमा करणारी? मी स्व:ताला भाग्यवान समजते. माझ्याकडे वळूनही न पहाता गेलास,पण माझ्याजवळ जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला आणि त्या क्षणांना तू मोहोळ होण्याची जादूही दिली होतीस. माझ्या जवळ एक विरहाचं दु:ख होतं लसलसणारं आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जागाच्या पाठीवर याचानिदान दिलासा होता. पण..पण तिने काय करावं? जिच्या केसांची आठवण ठेवून शिष्ठाईला गेलास,जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास.कृष्णेची लालूच कर्णाला दाखवून तिचाच की रे सौदा केलास ! तिच्यासाठी हा अपमान केवढा असेल?
आणि कृष्णा तिही किती मोठी ! तिनं सगळं सहज बंद केलं मनात.तू दिली असशील सफाई,युद्ध,धर्म,राजनीती, यांच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असशील. ती काय समजली नसेल? अरे जी द्यूत सभेतल्या तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते ,तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल? पण तिनं ते ही गिळलं माधवा... प्रेम फार जहरी असतं रे...फार कडू असतं गिळायला...मला विचार. तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेला आहे बघ.

पुढल्या एका प्रसंगात जेव्हा राधा म्हणते ," माझं फक्त तुझ्या अपुरेपणाशीच नातं होतं’ यावर तो मिश्किलीने म्हणतो,’ आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे. हे तू जेव्हा सहज स्वीकारलस ना, तेव्हाच माझ्या बरोबर, पुरेपणाशी तुझाही वायदा हौन गेला. हे तुला कळलच नाही बहुदा. मग उरलं त्या एक्क बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जाणं. त्या बिंदूवर आपण भेटणारचं होतो.’

जेव्हा तो तिला विचारतो,’तू सुखी होतीस मधल्या काळात?’
ती उत्तरते ,होतेही नव्हतेही, कारण माझ्यासाठी अनयाचं उबदार मन हे एक वास्तव होतं,विश्वास टाकावा असं वास्त्व होतं आणि दुसरी कडे तुझं दाट निळं प्रेम हेही एक वास्त्वच होतं. एक पार्थिव होत, दुसरं नव्हतं पण माझ्या मुठीत तर दोन्ही होतं, मी का सुखी नसावं? आणि भाबड्या कारणासाठी नव्हतेही - म्हणजे मला ही दोन्ही प्रेमं - ती दोन्ही सुखं घेऊन मिरवता नव्हतं येत.’म्हणुन खूप खंत केली आहे मी ! पण मग दिवस जात राहिले तसं कळलं मला देखील. कळलं की सत्य माहित असावं मनातून. जिवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा.पण ते उच्चारयचं असतं अगदी कधी तरी. वेळ आली तरच.तशी वेळ आज आली. शेवटी आज आली.’
यावर त्याचे बोल तिला यशोदामाईची आठवण करुन देतात...तो म्हणतो तू स्व:ताच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस  बये, हे तुला कळतं तर..तू खंत केलीच नसती’ तेव्हा तिला उमगत..’माझं अस्तित्वच एक मिरवणं आहे’ आणि हेच यशोदेने ओळखलं आणि शेवटच्या क्षणाला बोलावून सांगितलं, ’जर कधी काळी वातलं... वातलं त्या बघावसं< तर पाय मागे घेउ नको. मान अपमान ठेवू नको. लक्षात ठेव की, ते उपकार नसतील त्याचे ! त्याला भेटलीस तर त्यालाच सुखानं मरता येईलं’ असं म्हणुन तिनं त्याच सार बालप्ण तिच्या ऒटीत टाकलं आणि यशोदामाई मोकळी झाली. मात्र राधा कृष्णाला म्हणते ,’मला माझ्या स्व:ताच्या प्रेमाचाही वेढा पडला आहे. म्हणून तर आले इथवर.त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक लक्षात ठेव. ती आई होती. बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवडी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे.पण जगून जगून सगळ्या बायकांनी किती मऊ,किती उबदार केलं आहे त्याला ! त्याची घोंगडी माझ्या अंगावर येती, तर मीही यापूर्वीच सुटले असते. पण तसं नाही घडलं.मी तशीच उरले. कुडकुडत राहिले’ या तिच्या शब्दातली दु:खाची नस तिच्या मनाच्या खोल तळातल सार वर आणुन ठेवते.

त्यांच्यातील संवाद वेगळ्या पातळीवर येऊन पोहचतात.अनेक वेळा अनेक रुपके घेउन जीवनाचा अर्थ सांगून जातात. जेव्हा राधा द्रौपदीच्या स्वयंवराच्यावेळी असलेली कृष्णाची उपस्थिती आणि तेचे सावळे रुप अन तिचा यमुनेसारखा घमघमणारा सुगंध आपल्याला माहित आहे हे सांगुन कृष्णाच्या मनाचा ठाव घेते. गर्द रंगांच्या झिम्मडीत रंगून जाणारी ती कृष्णेला कृष्णाने भारंभार वस्त्रे पुरवल्यावर तृप्त होऊन निरंग होते यातून खुप काही अर्थबोघ होतो.तर सा-या प्रसंगातूनही निवळपणे पाण्यासारखा कृष्ण वाहत गेला, समुद्रासारखा त्या त्या वेळी रंगुन निघालास. पुन्हा कोणत्याही प्रसंगाची साधीशी खुण वा व्रणही नाही यावर त्याचही मार्मिक उत्तर येतं’ जगण्याची चव गेली बघ.खूप खारट,खूप तुरट लागतं आहे आयुष्य. युद्धानंतर राखेची चव कशी असायची? समुद्राचा विस्तार जेवढा अतळ असतो सई, तेव्हडाच त्याचा खारटपणाही अटळ असतो. त्याला गोडं राहाया येतं नसतं. वाटलं तरी’

जेव्हा तो म्हणतो,’ अनय हे माझचं मला एक चिर्वांछित रुप आहे,हे तुला ठाऊक कसं नाही?’ यावर ती हतबल होऊन स्व:ताला सावरते इथेच खुपसे अर्थ गवसतात.

जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा तो तिचा निरोप घेउन न वळता निघतो त्यावेळी ती म्हणते अरे मी तुला भॆटायला आले तर मी तुझा निरोप घ्यायचा तर तूच माझा निरोप घेऊन निघालास....इथे या क्षणालाच असं वाटतं की ठा या भेटीचा अंत नाही तर परत फिरुन येणारी सुरुवात आहे.

दुसरी व्यक्तिरेखा कुंतीची.
कुंतीलाही माडतांना लेखिकेला द्रौपदीचा मोह सुतला नाही आहे. पदोपदी ती तुलनात्मक वा सरळ द्रौपदीचा उल्लेख करते. ह्या स्त्री रेखा एकमेकांत गुंतल्या सारख्या वाटतात. त्यामुळे कुंतीवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखे वाटते.

कुंतीचे आयुष्य हे काही शब्दात रेखाटणे कठीणच. तिची ओळख ही पांडवांची आई  म्हणुनच राहिलेली.
तिचा विचार करायला गेले तर ती एकटीच आई होती, जे पुत्र होते ते तिचे एकटीचे..तिच्या रक्तामासातून जन्माला आलेले तरीही तिची ओळख बाजुला सारुन ज्याचा अंशही त्यांच्यात नाही अशा पंडूचे बनुन राहिलेले. तिला तिचे मातृत्व स्व:ताचे म्हणुन असे गाजवताच आले नाही.पंडु होता तेव्हाही आणि नव्हता तेव्हाही ,त्याच्याच सावलीत मिसळावे लागले.

कुंतीचे व्यक्तिमत्व समोर आणतांना ,ते हळूवर पणे उलगडत असतांना अनेक रंग सामोरे येतात..
अल्लड वयातली रात्री पाहिलेली चंद्रकोर असो वा दुर्वासांचा वर आणि त्यातून पुढे मार्गस्थ होत जाणारा प्रवास.
गांधारीशी युद्धपूर्व आणि युद्धानंतरचा आलेला संपर्क,वेगळ्या कोनातून कुंतीबरोबरच गंधारीच्याही मनाचा ठाव घेतात.
जेव्हा गांधारी विचारते,’कुंती तुला शूरसेनाच घर आठवतं का ग?’ इथे कुंती आपण दत्तक गेल्याच दु:ख विसरु शकत नाही त्याच बरोबर ते शल्यही.
आणि त्याचबरोबर गांधारीने मोकळेपणाने केलेली मनाची उलगड बोलून जाते.’गाधांरच माझं सोसायचं बळ होतं गांधाराच्या कोवळ्या आठवणींवर मी केवढी वर्ष काढली आहेत. तुला कळायच नाही.’
कुंती इथे विषादाने हसते आणि मनातच संवाद साधते..की हीच बहिणीची कमकुवत बाजू शकुनीने हेरुन सारी विषबिजे हस्तिनापुरात पुरली..

पुढे जेव्हा दोघींच्या संवादात भीष्मांचा उल्लेख येतो तेव्हा तिच्या जीवाची तळमळ पुढे येते आणि नकळत बोल निघतात.माझ्या द्रौपदीची परवड डोळ्यांनी पाहिली यांनी आणि यांच्या पाया पडावं आपणं? त्यांना शापावं इतकी तळमळले मी."
गांधारीही जुन्य आढवणींनी उदास होते.मुलांच्या हिडीस कृत्याची आठवण जग कधीही विसरणार नाही आणि क्षमाही करणार नाही.तरी तिला पितामहांच श्रांत मरण आठवतं आणि ती विचारते द्रौपदीच्या क्षमेशिवाय तसं मरण त्यांना शक्य होतं असं म्हणावं तरी कसं? यावर कुंतीही खेदाने म्हणते’ माझ्य सुनेनं क्षमा क्लीच होती त्यांना.म्हणून तर माझी जीभ मी उचलली नाही.’
कर्णाबद्दाल तिची ओढ आणि खर्ची घातलेला जन्म ह्या सगळ्यांची सल तिच्या शब्दांतून व्यक्त होते जेव्हा ती म्हणते’ तू पुढच्या जन्मी कुवारपणी आई झालेली कुंती हो माधवा,किंवा फार कशाला, नुसती बाई म्हणून जन्माला ये ! इथे असे वाटते की ती महाभारतातल्याच नव्हे तर सा-या स्त्रीकुळाचीच प्रातिनिधित्व ्करते आहे.

द्रौपदीशी मी धृताराष्ट्र व गांधारी समवेत वनात जाणार आहे ही सांगतांच तिने उच्चारलेल्या शब्दांतुन तिने द्रौपदीच्याही मनाचा थांग घेतला आहे हे प्रक्र्षाने जाणवते,’मी तुझ्या प्रेमाबद्दल विचारते आहे कृष्णे ! एक सांग, मी वापररेलं हे संबोधन उत्तरासाठी पुरेसं आहे?"

मातृत्वाच आवरण पूर्णपणे नष्ट होऊन फक्त एक स्त्री म्हणुन आपण उरलोय ह्याचा उल्लेख करतांना ती द्रौपदीला सांगते. द्युतसभेतेल्ल तुझे धिंडवडे बघुन माझ्या तली आई मेली. ही षंढ पोरं आपली नाहितच अस वाटल. युधाचे वारे वाहू लागले तसा माझ्यातल्या आईने थोडा तग धरला.कर्ण मेला तरी थोदा तग धरलाच होता.आणि जेव्हा मी माझं आणि कर्णाचं नातं सांगितलं आणि युधिष्ठिरानं शाप दिला तेव्हा माझ्यातली आई पूर्णपणे नष्ट झाली ! उरली ती फक्त बाई ! एक स्त्री. मी फक्त कुंती उरलेयं
यावर जेव्हा द्रौपदी तिला विचारते की मला कधी अशी सांती मिळेल का? या तडफडीतून सुटका होईल का?  तर, कुंतीचे उत्तर ’शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा ’समर्पण’ असतं, हे तुला माहित आहे? मागचा पुढचा विचार न करता अशावर तरी ओवाळून टाकयचं स्व:ताला, आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वत:ला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व नाही सोडता येत. शांतीची ती वाट तुला आता क्शी मोकळी असायची? स्वत्व राखणं ही गोष्ट फार मोठी बये,पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून.’

Friday, September 24, 2010

आभाळाचे गाणे....रविंद्र भट

रविंद्र भटांच्या लिखाणाची सर्वांत आवदती बाजू म्हणजे त्याचे लिखाण खुप ओघवते असते. भाषा शैली अगदी घरातल्या सोवळ्यासारखी. मनात गुंजत रहाणारी. पुस्तक वाचून झाले तरी परत परत त्या कथेकडेच मन धाव घेत रहाते. ’आभाळाचे गाणे’ खुप अथांग आहे. असे गाणे ज्याला गवसते आणि त्याचा अर्थ ज्याच्या पदरी पडून तो त्याचे सार्थक करतो ते आयुष्य खरच कारणी लागते. सुरुवातील हे आभाळाचे गाणे पुढे येणा-या विस्तृततेची पायरी दाखवून टाकते.

क्षितिजावरची सीमारेषा कवेत घेणे
आभाळाचे गाणे ॥ धृ ॥

सूर्यरथाच्या अश्वासंगे,
गुरूशुक्राच्या भ्रमणासंगे,
दिक्कालाचे बंधन तोडुन,
अनंतरुपी उरणे ॥१॥

असेल जेथे सजीव सृष्टी,
करणे तेथे पायस वृष्टी,
मातीमधल्या वात्सल्याला,
स्पर्शून जागे करणे ॥२॥

ज्वालामिखिची दूर्गम शिखरे,
 रण वाळूचे कोठे विखरे ।
जलचर भूचर सर्वांवरती,
 नील छत्र मज धरणे ।३॥

यज्ञ घडावा सदा अलौकिक,
स्वर हृदयातुन उमटो सात्विक ।
जगन्नियता म्हणो तथास्तु,
तम दुरितावे विरणे ॥४॥

भाऊ बंदकीला टाळून दामोदर्पंत आपली पत्नी सावित्री आणि विधवा बहिण गोदाक्का यांच्या समवेत फणसावळ सोडून वाईकडे प्रस्थान करतात. तिथे रास्त्यांच्या आश्रयाला येतात आणि कृष्णेच्या तिरावर वसलेल्या आसगावची आणि गणकेश्वराची आजीवन सेवा करण्याची शपथ घेतात. सावकारी करतांनाही प्रहिले ध्येय गरजूची मदत हेच ठेवून जाती धर्म,गरिब श्रीमंत असा भेदभाव टाळून एकीचा मंत्र सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच इतर सावकारांचा रोष पत्करतात तसाच बहिष्कारही. पण लहान पणापासूनच एकीचे आणि समानतेचे बाळकडो ते आपल्या मुलाला सदाशिवाला आणि यमुनेला पाजतात. यात पदोपदी सावित्री आणि गोदाकका साथ देतात. आपण जे करतोय त्याचे परिणाम काय होतील हे ठाऊक असुनही ते पाऊल मागे न घेता पुढे जात रहातात. सदाशिवाच्या मुंजीला कोणताही गावातला भट ब्राह्मण येणार नाही असे कळते तेव्हा ते वाईकडे निघतात आणि सदाशिवाला सांगतात तुझी मुंज झाली की आपण कुळदेवतेचा गोंधळ घालू. हा गोंधळ का आणि कशासाठी हे जेव्हा सदाशिव उर्फ आप्पा विचारतो तेव्हा त्याला इतक्या मार्मिकपणे ते उत्तर देतात की आपल्यालाही त्या अनुभवातून जाण्याची इच्छा होते. ते म्हणतात,"गोंधळ म्हणजे आदिमायेच्या सगुणस्वरुपाला सज्जनांनी घातलेलं साकडं. सद्धर्माच्या संरक्षणासाठी ! सात्विक भावाच्या अभिवृद्धीसाठी ! स्व:ताच माणुसपण सदैव जागृत ठेवण्यासाठी ! माणसाच्या मनी जन्मत:च एक राक्षस असतो. तो सदैव दान मागत असतो. क्रोधाचं ! मदाचं ! लोभाचं ! मोहाचं ! मत्सराचं ! कितीही आहुत्या घातल्या तरी त्याची भूक कधीही सरु पाहत नाही. मग तो गिळायला लागतो सा-या माणूसजातीला. त्याच्या चांगुलपणाला ! त्याच्या वात्सल्यभावाला ! त्याच्या भ्रातृभावाला ! जन्मदात्या आईचं काळीज मागतो आपली हावरट भूक भागविण्यासाठी ! हिरण्यकश्यपू होऊन पोटच्या पोराची खाण्दोळी करतो ! प्रत्यक्ष परमेश्वरालाही लत्ताप्रहार करायला मगं पुढं पाहात नाही...! आणि या सा-यातुन होतो लय ! सा-या स्रुष्टीचा ! तिच्या सर्जनाचा ! तिच्या उदरातले नवनिर्मितीचे कोवळे गर्भ उदरातच चिरदले जातात ! मनातल्या राक्षसाच्या जो आहारी जातो,तो होतो दुर्जन ! फक्त स्व:ताच्या स्वार्थाचा विचार करणारा. तो होतो लंपट. फक्त स्व:ताच्या भोगासाठी धावणारा...! या राक्षसाच्या आहारी जो जात नाही, तो सज्जन.तो देवमाणूस. त्याला हवी असते शांती ! त्याला हवा असतो सहवास ! त्याला हवा असतो निरामय, नि:स्वार्थ आनंद ! त्याला व्हायचं असतं आकाश. सा-या धरित्रीवर पांघरुण घालणारं ! त्याला व्हायचं असतं वाहणारी नदी. सा-या तहानलेल्यांची तहान भागविणारी ! आणि या सा-यांसाठी त्याला हवा असतो आशीर्वाद. सृष्टीकर्त्याचा. आदिमायेचा ! या आशीर्वादाची अतिशय करुणपणे केलेली प्रार्थना म्हणजे संतसज्जनांनी देची पुढे मागोतलेला जोगवा ! तिला जाग येण्यासाठी घातलेला गोंधळ...!!

पुढे मोठा झालेला आप्पा ,वडीलांची धुरा आपल्या खांद्यावर सहज पेलून घेतो. सावकारी गेलेली असते.मिळकत तुटपुंजी असते.यमुनाही सौभाग्य लेणे ्गमवून माघारी आलेली असते.तरी ते हरिजनांना आपल्यात सामावुन घेण्याचा प्रयत्न करतच रहातात. गांधींजीच्या तत्वांना आपले करुन लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. पारतंत्र्य कसे घातक आहे. त्यासाठी कशी पाऊले उचलावी लागतील ह्याचे ते समर्पक विश्लेषण देतात.त्यांना सदैव साथ गावचा बयाजी पाटील देतो आणि जन्मभराचे पांगळेपणही पदरात पाडून घेतो. आप्पाना मिठाच्या सत्याग्रहातले मिठ विकल्यासाठी तुरुंगवास भोगावा लागतो. त्याच्या मागे यमुना त्यांनी सुरु केलेली शाळा चालवते पण स्वातंत्याचे पाठ पढवते म्हणुन तिलाही तुरुंगाची वाट दाखविली जाते. पुढे दोघांचीही सुटका होते पण खंगलेल्या प्रकृतीमुळे यमुनेचा जीव शांत होतो.
आप्पा घरात नसतांना जमिनीची सालदारी करणारा भिमा परिस्थितीचा गैरफायदा घेउ पहातो तर त्यावेळी खटाशे खट या उक्तीला साजेसे असे आप्पाचा मुलगा गजानन,पिरोजी ह्या रामोश्याची मदत घेतो.
गावाची प्रगति हवी असेल तर आपल्या मुलाने शिकले पाहिजे हे कळून आप्पा गजाननाला पुण्यात पाठवतात तिथुनच त्याच्या संपर्क वृत्तपत्रांशी येतो आणि लढा वेगळ्या पातळीवर येउन पोहचतो. सामाजिक परिस्थितीची जाणिव ही गावातल्या बदलांवरही अवलंबुन आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. गांधी हत्येनंतर गावोगावी ब्राह्मणाची घरे जाळली जातात त्यात त्यांचेही घर भस्मसात होते आणि त्यातच आप्पाची बायकोही.
पुढे गजानन अमेरीकेला जातो.
स्वातंत्र्योत्तर जी प्रगतीची पाऊले पडू लागतात त्यातच कृष्णेवर मोठे धरण बांधण्याचे थरले जाते आणि त्यात  आसगाव आणि अशी अनेक गावे बुडीताखाली जाणार असे निश्चित होते.गावातील लोकांना इतर ठिकाणे प्रस्थापित करण्यात येते असते. पावसाळ्याचे दिवस असतात. कृष्णामाई दुधडी भरुन वाहत असते. आसगाव रिकामे व्हायला सुरुवात होते. आप्पा गणकेश्वराच्या मंदिरात जातात. पाण्याचा लोट येतो. आणि गणकेश्वरासकट आप्पाही जलसमाधिस्त होतात.

गजानन परततो...आणि बातमी देत असतो..मी गजानन सदाशिव भावे...एकेकाळी इथे आसगाव होते...

Thursday, September 9, 2010

’दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’...गौरी देशपांडे

दुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन कथा.
गौरी देशपांड्यांच्या कथांचे वैशिष्ठ्य म्हणजे स्त्री जीवनाचे विविधांगी रुप. स्त्री मनाची आंदोलने आणि त्याचा ठाव अगदी समर्थपणे त्या मांडतात. त्यांच्या कथांतील नायिका ह्या परिस्थितीला शरण जाणा-या असल्या तरी त्यातुन स्व:ताचा मार्ग चोखंदळ्पणे निवडून स्व:ताच्या अस्तित्वाची जाणिव सर्वांना करुन देउन मार्गस्थ होणा-या आहेत.
दुस्तर हा घाट मध्ये अशी एक सर्व सामान्य घरातील नायिका नमु, आई वडिलांचे छत्र नसल्यामुळे या ना त्या नातेवाईकांकडे वाढलेली. जिथे ज्या घरी असेल त्या घराच्या परिस्थितीला रुळुन स्व:तात बदल घडवून आणण्याची सहजता तिच्या अंगी आलेली आहे. कोणा नातेवाईकाने तिच्या शिक्षणात कधी आडकाठी केली नाही.
महाविद्यालयात प्रवेश केल्यावर तिचे इंग्रजी भाषेबद्दलचे, साहित्याबद्दलचे प्रेम तिला इंग्रजी भाषेचे शिक्षक हरिभाई ह्याची सर्वात आवडती शिष्या बनवते आणि त्यातुनच तिची ओळख त्यांचा मुलगा वनमाळीशी होते आणि मैत्रीची परिणीती विवाह बंधनात. लग्नाला होकार देण्यापूर्वी हरिभाई तिला विचारतात की तुझा हा निर्णय सर्व विचार केल्यानंतरच तू घेतला आहेस ना? त्याचे सारे गुन्हे माफ करुन त्याला तू नि:खळ प्रेम देऊ शकशील ना? या वर ती काहीच बोलत नाही तसेच तिला हरिभाईंच्या प्रश्नामागचा हेतूही कळत नाही.
लग्नानंतरचे दिवस म्हणजे स्वप्नझुल्यावरच्या हिंदोळ्यासारखे सरत जातात. एकमेकांत गुंतत जातात. मग अवचित पणे वनमाळिचा मित्र अलिस्टर प्रवेश करतो.त्याच्यात तिला एक खरा मित्र भेटतो ज्याच्याजवळ ती मनातला सारा मळभ रिता करु शकेल इतकी पवित्र मैत्री त्याच्यात होते.
अलिस्टरची बदली वनमाळी आपल्याबरोबर भारतात करवून घेतो. एक दिवस अचानक अलिस्ट्रच्या बायकोकडून वनमाळीचे दुस-या स्त्रीशी असलेले संबंध कळतात. प्रथम अविश्वास वाटावे असे हे विधान जेव्हा सत्याचे रुप घेऊन समोर उभे रहाते तेव्हा ती आतून पोखरुउन गेलेल्या खांबागत होते. आयुष्यात जीव तोडून केलेल्या प्रेमाची अशी प्रतारणा व्हावी ह्यांची खंत मनात सलत असतांनाच ती घर सोडून हरिभाईंकडे त्यांच्या गावातील घरात राहायला जाते. तिथेच पुढे शिकायचा निर्णय घेते. पण PhD साठी तिला मुंबईत वनमाळीकडेच जावे लागेल इथुन तिला पुढचे शिक्षण शक्य नाही असे जेव्हा हरिभाऊ सांगतात. तेव्हा ती सहजतेने परत विरलेल्या वाटेवरुन घरात प्रवेश करते. अभ्यासाच्या खोलीला स्व:ताच्या खोलीचे रुप देते आणि नव्या जोमाने शेक्सपिअरच्या प्रेमात पडते. थकलेले हरिभाऊ जगाचा निरोप घेतात.
गावातल्या वास्तव्यात तिची सखुबाई, तिचा मुलगा काळू याच्याशी जमलेले वात्सल्याचे नाते गहिवरते. नकुल ह्या आर्मी मधील पाय गमावून बसलेल्या सैनिकाशी औपचारिक मैत्री होते. साधी सरळ राहाणी हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनुन रहातो. तरी जुनी नाती ती तोडत नाही.्वनमाळी बद्दलची ओढ वा त्याची तिच्याकडे घेतली जाणारी धाव कमी होत नाही. जेव्हा तिला त्याच्या आईचे मतिमंदत्व आणि त्याने त्यावर स्व:तासाठी घेतलेला निर्णय की ज्यामुळे नकळत मातृत्वाच्या अनुभवाला पारखी झालेली नमू एका तठस्थ भूमिकेतून आपले नाते सांभाळते.सा-या मनांतील भावनांना कायमचे कोंडून अशाररिक प्रेम वनमाळीला देते. जेव्हा तो परत येण्याची तिला साद देतो तेव्हा दुस्तर अशा घाटावर ती एकटे रहाणे कबूल करते.

दुसरी कथा "थांग" ह्या कथीतील एक धागा मला नकळत पाऊलो कोलिओच्या ’ब्रिडा’ या कथेची आठवण देउन गेला. तो धागा म्हणजे 'Soulmate' .
कालिंदि नंदन बरोबर भारत सोडून परदेशात रुळू पाहातेय. कंपनीच्या जवळच सगळ्यां सहका-याची वसाहत असते. तिथेच वेगवेगळ्या देशातून आलेल्या सहका-यांच्या परिवांशी होणा-या भेटीगाठी, त्यांची औपचारिकता,त्यातील सहजता तर कधी फोलपणा हे साध्या सरळ आणि एकदम कोणात न मिसळणा-या कालिंदिला हळू हळू समजु लागतो. त्यात तसेच काळ्या सावळ्या रंगामुळे तसेच घरातील पैशाच्या चणचण परिस्थितीमुळे लग्न  न ठरु शकणा-या कालिंदिला अचानक नंदन सारख्या गैर मराठी पण तिच्याच ऑफिस मध्ये मोठ्या हुद्द्यावरअ सलेल्या नंदनने घातलेली मागणी,लग्न आणि नंतर तिने गमवलेली तिची मंद अपंग मुलगी मंदा.ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी बाळगुन असणारी कालिंदी. चार चौघातही नंदन तिचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. वेळेवेळी केलेला तिचा उपमर्द जणु तिच्या अंगवळणीच पडल्यागत झाले आहे. जर कधी तसे घडले नाही तर त्याचे तिला नवल वाटते. ह्या त्याच्या स्वभावला मोड घालतात त्याचे वरिष्ठ सहकारी दिमित्री आणि सहसहकारी इयान.
दिमित्री आणि इयान यांना कालिंदि बद्दल एक ओढ आहे. प्रत्येकाची आपली एक सांसारिक कहाणी आहे. दिमित्रीची बायको सर्वांत सुंदर ’आंगलीकी" तर इयान्ची बायको सुझी ही कर्तव्यदक्ष पण नव-याच्या बहकेल पणाला ओळखून असणारी आणि कालिंदिला सावध करणारी. इतर जोडपी विलेम-रने, बिरेन्द्र आणि कल्पना.
दिमित्री कालिंदिच्या मनातील डोहाच्या तळाशी पोहचून तिचा थांग घेऊ पहाणारा तर इयान वर वर उथळ पाण्यात तिच्या शरिराकडे आकर्षित होणारा.ते मिळाल्यावरही परत ओढ घेणारा.
दिमित्रीच्या स्वभावात एक संयम आहे, समतोल आहे.जे आवडतय ते ओरबाडून घेण्याची इच्छा नाही. त्या आवडीचा थांग घेण्याची प्रबळ आकांक्षा आहे. एका अपघातात विकलांग अवस्थेत दवाखान्यात पलंगावर असतांना कालिंदीला झालेली अनुभूती तिला त्याच्या जवळ खेचते. ती मनाने पूरण्पणे त्याच्यात गुंतते. नंदन फक्त शरीराचा स्वामी उरतो.तरी शेवटी ती परत भारतात परतण्याचा ाणि नंदन पासून वेगळे होण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ही नंदन अगदी व्यवहारीक बोलतो पण शेवटी उच्चारतोच की तू दिमित्रीकडे जाणार ना?

thang  vilem rane, iyan suzi, dimitri aangoliki, birendra kalpna.....kalindi nandan kanta.